अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे भरत नाट्य मंदीर पुणे येथे ‘नाट्यत्रिंविंधा’ या कार्यक्रमादरम्यान हृद्यविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले आहे. रंगभूमी, सिनेमा, मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने छाप पाडणार्या अश्विनी एकबोटे यांचे अवघ्या 44 व्या वर्षी निधन झाल्याने सार्यांकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘नाट्यत्रिंविंधा’ या कार्यक्रमात अश्विनींचादेखील सहभाग होता. मात्र कार्यक्रम चालू असताना अचानक त्या रंगमंचावर कोसळल्या. तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयी, आजकालची व्यस्त जीवनशैली यामुळे आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. म्हणूनच हृद्यविकाराचा धोका वाढवणार्या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला. तसेच हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान Cardio Pulmonary Resuscitation या पद्धतीचा वापर करा. तज्ञांच्या मते, हार्ट अटॅकनंतर CPR शिवाय जाणारे प्रत्येक मिनिट हे त्या व्यक्तीच्या जिवंत राहण्याची शक्यता १० टक्क्यांनी कमी करते. तसेच Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे हे ’5′ संकेत मूळीच दुर्लक्षित करू नका.
image Source Zee Talkies