Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नवरात्रीदरम्यान अनवाणी चालण्याचे व्रत करताना पायांची काळजी कशी घ्याल ?

नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ रंगांची धूम, रास-गरब्याची मज्जा सोबतीला  उपवास  आणि  आदि शक्तीचा  जागर  असतो.  काहीजण  नवरात्रीच्या  नऊ  दिवसांमध्ये  कडक  उपवासासोबत अनवाणी  चालण्याचे  व्रत  पाळतात.  मात्र  अशा प्रकारचे  व्रत  करताना  थोडी  विशेष  काळजी  घेणं  आवश्यक  असते. म्हणूनच  अनवाणी  चालताना किंवा त्यानंतर त्रास होऊ  नये म्हणून  नेमकी  कोणती  काळजी  घ्यावी  याबद्दलचा  खास  सल्ला  नोबल हॉस्पिटल, हडपसर-पुणे येथील  Department of Prosthetics & Orthotics इनचार्ज डॉ.  संजिव  कश्यप यांनी  दिला  आहे.

  • अनवाणी चालण्याने  पायांना  त्रास  होऊ  शकतो.  त्यामुळे  तो  टाळण्यासाठी  सकाळी  उठल्यावर  पायाचे  स्टेचिंग  व्यायाम  करावेत.  त्यानंतरच  दिवसाची  सुरवात  करावी.  यामुळे  अचानक  पायांच्या  स्नायूंवर  अति  ताण  येणार  नाही.
  • शक्यतो  खूप  वेळ  चालणे,  दगदग,  प्रवास  टाळावा. उपवासामुळे  शरीरात  उर्जा  कमी  असते.  सोबतीला  अति चालल्याने त्रास  अधिकच वाढू  शकतो. विनाकारण  थकवा  वाढतो. (नक्की वाचा : नवरात्रीदरम्यान उपवास अधिक आरोग्यदायी मार्गाने करण्यासाठी खास ‘मिल प्लॅन’ )
  • अनवाणी  चालताना  खडबडीत  रस्त्यांवरून  चालण्याऐवजी  सपाट  रस्त्यांवरून चालण्याचा  अधिक  प्रयत्न  करावा.  त्यामुळे  पायांचे,  टाचेचे  दुखणे  वाढणार  नाही.  तसेच  ओल्या  जमिनी वरूनही  चालणे  टाळावे.  यामुळे संसर्गाचा धोका  वाढू  शकतो.
  • अनवाणी  चालल्याने,  अति परिश्रमामुळे  पायांना,  टाचांना  त्रास  झाल्यास, वेदना  जाणवू  लागल्यास  पाय  कोमट  पाणी  व मीठाच्या  मिश्रणामध्ये  बुडवावेत.  यामुळे ताण  कमी  होऊन  स्नायू आरामदायी होण्यास  मदत  हो ईल.  तसेच पोटर्‍यांच्या भागांवर त्रास  जाणवत  असल्यास  तेलाचा  मसाज करावा. (नक्की वाचा : पायाचे दुखणे टाळण्यासाठी ’5′ खास टीप्स !
  • नियमित  बाहेरून  आल्यानंतर  पाय  पाण्याचे  स्वच्छ  धुऊन  कोरडे  करावेत.  पायाला जखम  असल्यास,  चिर  पडलेली  असल्यास  पाय  अ‍ॅन्टिसेप्टीकयुक्त  पाण्याने  स्वच्छ  धुणे गरजेचे  आहे.  अन्यथा  इंफेक्शन हो ऊन  जखम  चिघळण्याची किंवा त्यातून  काही  त्रास  वाढण्याची  शक्यता  अधिक  असते.  त्यामुळे  धूळ,  चिखल,  घाण  यां पासून  दूर  राहण्याचा  शक्यतो  प्रयत्न करा.

नवरात्री दरम्यान कोणी अनवाणी चालणं टाळावे ?

काही जणांसाठी  अनवाणी  चालणं  हा  नवरात्रो त्सवातील  एक  महत्त्वाचे  व्रत  असले  तरीही  आरोग्याच्या  दृष्टीने, मधुमेही, अर्थ्राईटीस ( सांधे दुखीचा त्रास  असणा र्‍यांनी) तसेच  PVD  रुग्णांनी  अनवाणी  चालण्याचे  व्रत  कटाक्षाने  टाळावे.

Image Source :  shutterstocks

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>