पावसाला नुकतीच दमदार सुरुवात झालीय.मात्र संततधार पावसाच्या सरींमुळे व त्यातून वातावरणात निर्माण होणा-या ओलाव्यामुळे घरात एक प्रकारचा कुबट वास येऊ लागतो.वातावरणातील आर्द्रता बुरशीच्या वाढीला पोषक असते.या बुरशीमुळे केवळ घाणेरडा वास निर्माण होतो असे नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी देखील अपायकारक ठरु शकते.यामुळे तुम्हाला इतर आजारपणांसह श्वसन समस्या व अॅलर्जी अशा आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ शकतात.यासाठी या पावसाळ्यात घरातील हा कुबट व आरोग्याला अपायकारक असा दुर्गंध घालविण्यासाठी या घरगुती टीप्स जरुर करा.तसेच वाचा डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी !हे देखील वाचा.
१.घरामध्ये कापूर जाळा-
सामान्यत: आपण देवपूजा करताना अथवा एखादा धार्मिक विधी करताना देवासमोर कापूर जाळतो.पण तुम्हाला हे माहित आहे का? कापूर जाळून तुम्ही बूरशी व घरातील दुर्गंध देखील दूर करु शकता.यासाठी घरातील प्रत्येक खोलीमध्ये कापराच्या काही वड्या जाळ्या.लश्रात ठेवा कापूर जाळताना तो एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्ये घ्या कारण कापूर थेट लादीवर जाळल्यास त्याचे डाग लादीवर तसेच राहू शकतात.यासाठी कापराच्या सर्व वड्या व्यवस्थित जळू द्या.कापूर जाळल्यावर घराचा दरवाजा व खिडक्या बंद करा.कमीतकमी पंधरा मिनीटे ते अर्धा तास दारे-खिडक्या बंद ठेवा.या उपायाने तुमच्या घरात नक्कीच एक प्रकारचा सुंदर सुगंध दरवळू लागेल.यासाठी वाचा घरात कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे !
२.सुर्यप्रकाश घरात येऊ द्या-
पावसाळ्यात फार कमी वेळा सुर्यप्रकाश दिसतो.पण जेव्हा जेव्हा सुर्यप्रकाश असेल तेव्हा तो घरात येऊ द्या.त्याच प्रमाणे बाहेरची ताजी हवा देखील तुमच्या घरामध्ये ताजेपणा आणेल.त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवा.शक्य असल्यास घरात एकमेकांसमोर असलेले दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवा ज्यामुळे घरामधील हवा खेळती राहील व घरामध्ये दुर्गंध येणार नाही.
३.मीठाचा वापर करा-
मीठ विशेषत: समुद्री मीठ घरात येणारा घाणेरडा वास शोषून घेते.मीठ हे निसर्गत: Hygroscopic असल्यामुळे मीठामुळे घरामधील ओलसरपणा व आर्द्रता कमी होण्यास देखील मदत होते.यासाठी एका जाळीच्या पिशवीमध्ये अथवा जाळीदार कापडामध्ये समुद्री मीठ अथवा खडे मीठ भरुन ती बॅग रुममध्ये ठेवा.मात्र दर दोन ते तीन दिवसांनी त्यातील मीठ बदलण्यास विसरू नका.
४.व्हाईट व्हिनेगरचा वापर करा-
व्हिनेगर दुर्गंध दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.यासाठी तुमच्या रुममध्ये एका बाऊलमध्ये एक कप व्हाईट व्हिनेगर भरुन ठेवा.या प्रयोगामुळे काहीच दिवसांमध्ये तुमच्या घरातील कुबट वास कमी होण्यास मदत होईल.
५.कडूलिंबाचा वापर करा-
कडूलिंबाच्या पानांमुळे तुमचे कपडे अथवा इतर गोष्टींवरील बूरशी नष्ट होते.यासाठी कडूलिंबाच्या छोट्या फांद्या तुमचे कपडे अथवा कपाटामध्ये ठेवा.यामुळे कपाटामध्ये बुरशी येणार नाही व घरामध्ये दुर्गंध देखील येणार नाही.जाणून घ्या कडूलिंब – फंगल इंन्फेक्शन दूर करण्याचा नैसर्गिक उपाय !
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock