उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेचा तडाखा शरीरातील उर्जा कमी करतो. अशावेळेस आहारातून, फळांमधून, भाज्यांमधून शरीरात पाण्याचा आणि उर्जेचे समतोल राखण्यासाठी प्रयत्नपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. शहाळ्याचं गोड पाणी आणि पातळ मलई जशी आपल्याला रिफ्रेश करते. तसेच भारतीय किनारपट्टीवर ‘ताडगोळा’ हे फळ या दिवसात मुबलक प्रमाणात आढळते. लिचीप्रमाणे आवरण असणारे पारदर्शक आणि पाणीदार लहानसे फळ म्हणजे ताडगोळा.
ताडगोळा हे चवीला गोडसर असते. पण या फळाबरोबरच त्याच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. कडाकाच्या उन्हांत नीरा हे एक रिफ्रेशिंग पेय म्हणून समजले जाते. परंतू सकाळी आणि ताजी निरा ही आरोग्याला हितकारी असते. नीरा काढल्यानंतर लगेचच न प्यायल्यास त्याचे रुपांतर ‘ताडी’ म्हणजेच सौम्य प्रकारच्या दारूमध्ये होते. ताडी चवीला आंबट आणि उग्र चवीची असते.
- ताडगोळ्याचे आरोग्यदायी फायदे -:
#1 शरीराचे तापमान नियंत्रणामध्ये राहते -
ताडगोळा थंड स्वरूपाचा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेचा या दिवसात त्रास होण्यापासून बचाव होण्यास मदत होते.
#2 मायक्रोन्युट्रीअंटसचे प्रमाण वाढावते -
डॉ. नेहा संल्वल्का या आहारतज्ञांच्या मते, ताडगोळ्यामध्ये सोडीयम,पोटॅशियम यासारख्या मायक्रोन्युट्रीअंट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारा डीहायड्रेशन आणि उष्माघाताचा त्रास कमी होतो. परिणामी थकवा जाणवत नाही.
नीरा पिण्याचे फायदे -
#1 डीहायड्रेशनच्या त्रासापासून आराम मिळतो -
सकाळ सकाळ काढलेल्या पाण्याचे म्हणजेच निराचे सेवन केल्याने रिफ्रेशिंग वाटते. ताडगोळ्याप्रमाणे निरादेखील आरोग्यदायी आहे. एका दिवसात 1-2 ग्लास निरा पिणे फायदेसहीर ठरते. यामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
#2 शरीराला उर्जा मिळते –
नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात उर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
डॉ. संल्वंका यांच्यामते, तुम्ही वेट लॉसच्या मिशनवर असाल तर नियमित नीरा पिणे अडथळा ठरू शकतो. निरामध्ये साखर आणि कॅलरीज अधिक असतात. निराऐवजी साखर,मीठ घातलेले लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरू शकते.