आजकाल भारतामध्ये हार्ट अटॅक येण्याचे सरासरी वय साठ ते चाळीस वयापर्यंत खाली आले आहे.ह्रदयविकार भारतामध्ये मृत्युदराचे प्रमाण वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.जयपूरच्या TAVI program EHCC Hospital चे डायरेक्टर डॉ.रविंदर सिंग राव यांच्या मते भारतात इतर कोणत्याही विकारापेक्षा ह्रदय विकाराने होणा-या मृत्युचे प्रमाण अधिक आहे ही खरंच चिंतेची बाब आहे कारण खरंतर ह्रदयविकार हे रोखता येऊ शकतात.ह्रदय हा गर्भामध्ये गर्भधारणा झाल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारा एक अद्भुत अवयव आहे.त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे फार गरजेची आहे.डॉ.राव पश्चिम भारतातील एका ६० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीची valve-in-valve ही एक अद्वितीय शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिल्यांदा आले होते.यासाठी Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे ’5′ संकेत !देखील जरुर वाचा.
डॉ.राव यांच्यामते भारतात ह्रदयविकार वाढण्याची ही चार प्रमुख कारणे आहेत-
१.आहार- केवळ सर्वत्र उपलब्ध असणारे जंकफूडच नाही तर भारतीय आहार व्यवस्था देखील कार्बोहायड्रेट समृद्ध आहे.त्यामुळे एखाद्याने जरी घरी बनविलेल्या ८ ते १० पोळ्या खाल्या तरी त्याच्या कॅलरीज वाढू शकतात.
२.व्यायामाचा अभाव-अति प्रमाणात कॅलरीज घेणे व व्यायाम व शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कॅलरीज योग्य प्रमाणात बर्न न झाल्यामुळे त्याचा ताण ह्रदयावर येतो.यासाठी वाचा हृद्यरोगींनी हार्ट अटॅकनंतर योगा करणे सुरक्षित आहे का ?
३.अनुवंशिकता-आपण या समस्येला टाळू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने या समस्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी सावध असणे गरजेचे आहे.
४.धूम्रपान-भारतीयांमध्ये याचे प्रमाण वाढत असून त्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.
भारतातील या हार्ट हेल्द क्रायसेस बाबत आम्ही नामांकीत कार्डिओलॉजिस्टशी संवाद साधला.
जर ह्रदयविकार रोखता येऊ शकतात तर त्यांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे?
डॉ.राव यांच्या मते ह्रदय विकाराबाबतचे अज्ञान व जीवनशैलीत झालेले बदल यामुळे ह्रदयविकारांचे प्रमाण वाढत आहे.याचा अर्थ चांगल्या सवयींचे पालन केल्यामुळे ह्रदयसमस्या होणार नाहीत असे नाही.पण सुधारीत उपाययोजना करुन ह्रदय समस्या कमी करता येऊ शकतात किंवा त्यापासून बचाव करता येऊ शकतो.उदा.जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो तेव्हा त्यापैकी केवळ पन्नास टक्के रुग्णच हॉस्पिटलमध्ये वेळेत जाऊन उपचार घेण्यासाठी सक्षम असतात.(जर त्यांनी त्यांच्या ह्रदयाची योग्य काळजी घेतली तर) उरलेले पन्नास टक्के रुग्ण हार्ट अटॅकमध्ये त्यांचा जीव गमावतात.यासाठी हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर या 8 गोष्टींची मदत पटकन करा !
ह्रदयाच्या आरोग्याबाबत जनजागृती करुन देखील आपल्याला आजही ह्रदयविकारावर नियंत्रण ठेवण्यात का यश येत नाही?
डॉ.राव यांच्यामते ह्रदयविकार रोखण्यासाठी कुटूंब व समाजातील सर्वांनीच निरोगी जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे आहे.उदा.समजा कुटूंबामध्ये एखाद्याला ह्रदयविकार असेल व त्यासाठी विशिष्ट जेवण तयार केले जात असेल तर कुटूंबातील सर्वांनी तेच जेवण खाणे गरजेचे आहे.त्यामुळे कुटूंबातील इतर मंडळींना ह्रदयविकार होणार नाहीत.तसेच ह्रदयविकार ग्रस्त रुग्णांनी एकत्र येऊन चालणे,खेळणे अशा चांगल्या व निरोगी सवयी एकमेंकांसोबत स्वत:ला लाऊन घेतल्या पाहिजेत.डॉक्टरांच्या मते जीवनशैलीमध्ये योग्य बदल करण्यासाठी रुग्णाला कुटूंब व मित्रमंडळींच्या सहकार्याची अत्यंत गरज असते.तसेच वाचा बारीक व्यक्तीलाही हार्ट अॅटॅक येऊ शकतो का ?
ह्रदयविकार रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये योग्य बदल करणे लोकांना का कठीण जाते?
जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी वैयक्तिक दृष्टीकोनाचा क्वचितच फायदा होऊ शकतो.डॉ.राव यांच्या मते याच कारणासाठी ते ह्रदयविकार असलेल्या रुग्णांच्या कुटूंबाला त्या रुग्णाला याबाबत सहकार्य कऱण्यासाठी प्रोत्साहीत करतात.धूम्रपान करणे केवळ एकाच व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण कुटूंबासाठी कसे घातक आहे हे त्यांना पटवून देतात.यासाठी वाचा व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य.
सर्वांनी ह्रदयाच्या आरोग्याबाबत सावध का असावे?
आपल्यासारख्या विकसिनशील देशात झालेल्या सुधारणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करुन आजारपणाला विशेषत: ह्रदयविकारांना दूर ठेवता येऊ शकते.त्यामुळे ह्रदयाचे आरोग्य जपले व योग्य जीवनशैली आचरणात आणली तर तुम्हाला निरोगी आयुष्य जगणे सहज शक्य होऊ शकते.तसेच ह्रदयविकाराचा दुसरा झटका टाळण्यासाठी पाळा या ८ टीप्स ! अवश्य वाचा.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock