वाढत्या उन्हाळ्यामुळे अंगातून घामाच्या धारा येणे,अंगावर घामोळे उठणे व डीहायड्रेशनचा त्रास होणे या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते.पण लक्षात ठेवा शरीरातील काही महत्वाच्या अवयवांवर देखील उन्हाळ्याचा तितकाच प्रभाव पडत असतो.उन्हाळ्यामध्ये अनेकांना किडनीच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात.
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या यूरोलॉजी विभागाचे हेड डॉ. प्रदीप राव यांच्या मते भारतामध्ये पाच ते सात दशलक्ष लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे.उन्हाळ्यातील या वाढत्या तापमानामुळे या संख्येमध्ये अधिकच भर पडू शकते.यासाठी किडनीस्टोनबाबत या ’8′ गोष्टी नक्की जाणून घ्या
उन्हाळ्यामध्ये किडनी समस्या का निर्माण होतात?
उन्हाळ्यामध्ये ब-याचदा आपल्याला डीहायड्रेशनचा त्रास जाणवतो.कारण घामाद्वारे शरीरातील आवश्यक मिनरल्स बाहेर टाकली जातात.डॉ.राव यांच्या मते शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे लघवीची निर्मिती देखील कमी होते.त्यामुळे किडनीमध्ये टाकाऊ मीठाचे प्रमाण वाढू लागते.कालांतराने त्याचे कठीण व स्फटिक तुकडयांमध्ये रुपातंर होते ज्याला किडनी स्टोन असे म्हणतात.जर हा स्टोन आकाराने अधिक वाढला तर पोटात तीव्र वेदना होतात ज्यामुळे तो काढून टाकण्यासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज भासू शकते.त्यामुळे किडनीस्टोनचा त्रास वेळीच ओळखण्यासाठी या लक्षणांकडे दूर्लक्ष करू नका
उन्हाळ्यात किडनी स्टोन पासून वाचण्यासाठी करा हे सोपे उपाय-
मुबलक पाणी प्या-
दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने किडनी स्टोन व इतर आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.डॉ.राव यांच्या मते पाण्याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स व किडनी स्टोन साठी कारणीभूत असणारे टाकाऊ मीठ बाहेर टाकले जाते.याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर सहाजिकच तुमच्या शरीरात किडनी स्टोन विकसित होऊ शकतो.यासाठी किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती पाणी प्यावे? हे देखील नक्की जाणून घ्या
तुम्ही ताज्या फळांचा रस,ताक,लिंबू पाणी ही पेय देखील घेऊ शकता.मात्र कॉफी,सुगंधित चहा आणि कोला अशी पेय घेणे टाळा कारण त्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची अधिक शक्यता असते.हे जरुर वाचा लिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !
आहारावर नियंत्रण ठेवा-
उन्हाळ्यामध्ये आहारात साखर व मीठ कमी प्रमाणात घ्या.अति मीठामुळे तुमच्या हाडांमधील कॅलशियम बाहेर टाकले जाते जे किडनीमध्ये जमा होते.अति साखरेच्या पदार्थामुळे देखील शरीरात ग्लूकोजचे प्रमाण वाढते ज्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.
अनेक चांगल्या पदार्थांमध्ये असलेल्या ऑक्सलेट या घटकामुळे देखील किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.ऑक्सलेट व कॅलशियम मिळून किडनी स्टोन तयार होतो.शेंगदाणे,शिंबी,रताळे,पालक व बीट यामध्ये ऑक्सलेटचे घटक असतात.तसेच कॅलशियम चे घटक देखील याला कारणीभूत असतात.आपल्या शरीराला दिवसभरात १००० ते १३०० मिग्रॅ कॅलशियम व ४० ते ५० मिग्रॅ ऑक्सलेटची गरज असते.टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ?
त्यामुळे जर तुम्ही कॅलशियम सप्लीमेंट घेत असाल तर त्याचे प्रमाण जरुर पहा.दोन ग्लास दूध,एक कप योगर्ट व स्वादिष्ट पालक पनीर एकत्र घेणे म्हणजे जास्त प्रमाणात कॅलशियम घेण्यासारखेच आहे.तसेच मुठभर शेंगदाण्यातून ऑक्सलेटचे प्रमाण गरजे पेक्षा जास्त होऊ शकते.लक्षात ठेवा कधीकधी चांगल्या पदार्थांचा अति सेवनामुळे देखील आजारपण येऊ शकते.त्यामुळे असे पदार्थ प्रमाणातच खावे.स्टोनची समस्या टाळण्यासाठी कॅलशियम व ऑक्सिलेटयुक्त पदार्थांचे प्रमाण आहारात कमी ठेवा.
डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करा-
जर तुम्हाला पूर्वी किडनी स्टोन झाला असेल तर तो तुम्हाला पुन्हा देखील होऊ शकतो.त्यामुळे वेळीच याबाबत योग्य ती दक्षता घ्या.काही वेळा औषधोपचारांनी किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.डॉ.राव यांच्यामते Hydrochlorothiazide सारख्या औषधांमुळे मूत्रामध्ये हाडांमधील कॅलशियम वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे सहाजिकच कॅलशियम स्टोन निर्माण होण्याची शक्यता कमी होते.पण त्यासोबत तुम्ही आहारातील मीठाचे प्रमाण देखील कमी करायला हवे कारण तरच या औषधांचा योग्य परिणाम होऊ शकतो.औषधांमुळे मूत्रामधील Cystine ची पातळी देखील कमी होते ज्यामुळे Cystine स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो.मात्र ही औषधे घेण्यापूर्वी तुमच्या यूरोलॉजीस्टचा सल्ला जरुर घ्या.
तुम्ही घेत असलेली इतर औषधे तपासून बघा-
काही वेळा तुम्ही घेत असलेल्या Protease Inhibitors, Antibiotics ,Diuretics अशा काही औषधांमुळे देखील किडनी स्टोन होऊ शकतो.अति प्रमाणात घेतलेले अॅन्टासिड व कॅलशियमच्या गोळ्या देखील हानिकारक ठरु शकतात.जर तुम्ही अशी औषधे घेत असाल तर याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.कारण कदाचित या औषधांचे सेवन कमी करुन तुम्हाला तुमच्या शरीरात किडनीस्टोन विकसित होणे टाळता येऊ शकते.
नैसर्गिक विधी थांबवू नका-
बराच काळ लघवी थांबवून धरणे तुमच्या किडनी साठी मुळीच चांगले नाही.तसेच त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.कारण लघवी तुमच्या मूत्राशयामध्ये जेवढा वेळ जमा होईल तेवढा वेळात मूत्राशयातील टाकाऊ मिनरल्स आणि मीठाचे किडनीस्टोनमध्ये रुपांतर होण्यास मदत होईल.
Read this in English
Translated by Trupti Paradkar
छाया चित्र सौजन्य : Shutterstock