Quantcast
Channel: » Marathi
Viewing all 1563 articles
Browse latest View live

या घरगुती उपायांनी काळवंडलेली हनुवटी अधिक सतेज बनवा !

$
0
0

काही वेळेस उन्हामुळे किंवा खाण्यापिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे त्वचेवरील रंगामध्ये काही फरक दिसून येतो. डिसकलरेशनमुळे सौंदर्य आणि सोबतच तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. हार्मोन्सची पातळी वर खाली  होणं, वारंवार वॅक्सिंग,थ्रेडींग, स्मोकिंगची सवय, हायपरपिंगमेंटटेशन यामुळे मृत त्वचेचा थर वाढतो. यामुळे त्वचा अधिक काळवंडते. प्रामुख्याने ओठ आणि हनुवटीजवळील त्वचा काळसर होते. Bharti Taneja’s ALPs Group, च्या Aesthetician & Cosmetologist and Founder- Director of Bharti Taneja’s ALPs Group, भारती तनेजा यांनी दिलेला हा सल्ला तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरेल ?

पपई

पपईमध्ये पॅपिन नामक स्किन क्लिन्जिंग़ घटक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आढळतात. यामुळे हनुवटीजवळील त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.  ओठांजवळील काळसरपणाही कमी होतो. कच्चा पपई किसून त्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाबपाण्याचे काही थेंब मिसळा. हा पॅक चेहर्‍यावर काळवंडलेल्या भागावर लावा. नियमित पपईचा थर चेहर्‍यावर लावल्याने तेथील त्वचा अधिक नितळ होण्यास मदत होते.

कच्च दूध

कच्च्या दूधामध्ये मॉईश्चरायझर आणि ब्लिचिंग घटक मुबलक असतात. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते. त्वचेवर जमा झालेले घटक,मळ दूर होण्यास मदत होते. पहिल्यांदा चेहरा पाण्याने स्वच्छ करा त्यानंतर कच्च्या दूधामध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याने चेहरा स्वच्छ करा. हनुवटीजवळील काळसर त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल.

कम्पलसिव्ह नरिशिंग

ऑलिव्ह ऑईल, बदामाचे तेल यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते. यामुळे त्वचेला मॉईश्चरायझर मिळते,त्वचेतील शुष्कता कमी होते. परिणामी त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल हनुवटीवर लावून मसाज करा.

लिंबू

काकडीचा रस, चंदन पावडर एकत्र करा. त्यामध्ये मध व लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. हा पॅक काळवंडलेल्या त्वचेवर लावा. थोड्यावेळाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. लिंबातील व्हिटॅमिन सी घटक आणि सॅट्रीक अ‍ॅसिड त्वचेतील काळसरपणा नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते. तसेच काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते. तसेच त्वचेतील सतेजता वाढवण्यास  मदत होते.

 

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


गरोदरपणात जुळ्या गर्भाची कशी काळजी घ्याल ?

$
0
0

आई होणं हा स्त्रीच्या जीवनातील एक सुखद अनुभव असतो. विशेषत: जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांना जन्म देणार असता तेव्हा तुमच्या गर्भात दोन  जीव वाढत आहेत ही भावना फारच सुखावह असते.सहाजिकच तुम्हाला इतर गरोदर स्त्रीयांपेक्षा अधिक काळजी घेत सावध राहण्याची गरज आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानूसार ३० ते ४० या वयोगटातील गरोदर स्त्रीयांमध्ये जुळी बाळं होण्याची शक्यता अधिक असते असे आढळले आहे.कारण या वयोगटातील स्त्रीयांमधील ओव्हूलेटरी सायकल अनियमित असते.त्यामुळे दोन स्त्रीबीजांचे ओव्हूलेशन होऊन त्यांना  जुळी गर्भधारणा होऊ शकते.हे जरुर वाचा जुळ्या बाळासाठीचे प्रयत्न यशस्वी करतील हे ’6′ पर्याय !

जुळी गर्भधारणा झाल्यास काय काळजी घ्याल-

अशा वेळी तुमच्या शरीराचे व बाळांचे योग्य पोषण करत तुमचे वजन देखील नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी जरुर लक्षात ठेवा-

१.प्रसूती तज्ञांची नियमित भेट घ्या-

तुम्हाला जुळी गर्भधारणा झाली असेल तर गरोदरपणात तुम्हाला सतत अल्ट्रासाउंड व काही टेस्ट कराव्या लागतात.ज्यामुळे डॉक्टरांना तुमच्या बाळाची वाढ व विकासाबाबत अचूक माहिती मिळते.जाणून घ्या गर्भात असताना बाळ करते या ’8′ इंटरेस्टिंग गोष्टी !

२.पोषणमुल्ये वाढवणे-

जर एखाद्या मातेला दोन अथवा त्यापेक्षा जास्त गर्भधारणा झाली असेल तर त्या मातेने अधिक प्रमाणात प्रोटीन,फॉलीक अॅसिड,कॅल्शियम,लोह अशा अनेक पोषणमुल्यांचे सप्लीमेंट घेणे गरजेचे अाहे.यासाठी दररोज योग्य व पोषक आहार घ्या.तसेच गरोदरपणात आठवणीने प्रसूतीपूर्व व्हिटॅमिन देखील घ्या.कारण जुळे गर्भ असलेल्या गरोदर स्त्रीला अॅनिमिया होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे तिला व तिच्या गर्भांना अधिक लोह व आवश्यक पोषणमुल्यांची गरज असते.यासाठी हे जरुर वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

३.अधिक आराम करणे-

अशा वेळी काही जणींना गरोदरपणात घरी अथवा हॉस्पिटलमध्ये पुरेसा आराम करण्याची गरज लागू शकते.मात्र हे त्या स्त्रीची शारीरिक अवस्था व तिच्या समस्या यावर अवलंबून असू शकते.साधारणपणे प्रौढ वयातील व जुळी अथवा तिळी गर्भधारणा असणा-या गरोदर स्त्रीला तिच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीमध्ये बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात येतो.यासाठी वाचा बेड रेस्टचा सल्ला दिलेल्या गरोदर स्त्रीयांसाठी खास टीप्स !

४.प्रसूतीकाळ लवकर असणे-

एकच गर्भधारणा असेल तर प्रसूतीपर्यंतचा कालावधी हा ३९ आठवड्यांचा असतो.पण जुळ्या गर्भांसाठी हा कालावधी ३७ आठवडे अथवा त्यापेक्षाही अगोदर असू शकतो.असे म्हटले जाते जितके जास्त गर्भ तितका गरोदरपणाचा कालावधी कमी असतो.डॉक्टरांच्या मते जुळ्या बाळांचा जन्म ३४ आठवड्या नंतर होणे हे सामान्य आहे.जर तुमची प्रिमॅच्युर डिलीवरी होण्याची शक्यता असेल तर डॉक्टर तुमच्या बाळांच्या फुफ्फुसांच्या वाढीसाठी तुम्हाला स्टिरॉइडस देऊ शकतात.कारण आजकाल प्रिमॅच्युर बाळांमध्ये फुफ्फुसांची वाढ कमी होण्याची समस्या अधिक वाढत आहे.या ’11′ कारणांमुळे वाढतो प्रिमॅच्युअर डिलेव्हरीचा धोका !

५.सिझेरीयन डिलेवरी-

जुळी बाळे असतील तर सिझेरीयन डिलीवरीची शक्यता अधिक असते.तुमची नैसर्गिक प्रसूती देखील होऊ शकते पण हे त्यावेळी बाळांच्या असलेल्या स्थितीवर अवलंबून असते.जर पहिल्या बाळाचे डोके खालच्या दिशेने असेल तरच नैसर्गिक प्रसूती करणे सुलभ असू शकते.कधीकधी पहिले  बाळ नैसर्गिक प्रसूतीने जन्माला येते तर काही समस्या आल्यास दुस-या बाळासाठी मात्र सिझेरीयन करावे लागते.यासाठी वाचा सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका

५.उच्च रक्तदाब-

जुळ्या गर्भाधारणा असलेल्या मातेला उच्च रक्त दाबाचा त्रास असण्याची दाट शक्यता असते.उच्च रक्त दाबासह मूत्रामध्ये प्रोटीन असल्यास Preeclampsia ही समस्या होऊ शकते.ही समस्या गरोदरपणात सामान्यत: २० आठवड्याआधी किंवा ३७ आठवड्यानंतर होते.कधी कधी गरोदरपणाच्या दुस-या टप्प्यात Pre-eclampsia ही समस्या होण्याची देखील शक्यता असते.वेळेत निदान झाल्यास नियमित औषधोपचारांनी या समस्या कमी करता येऊ शकतात.आता गरोदर स्त्रियांमधील ‘हाय बीपी’चे निदान वेळीच होणार !

जुळ्यांचे प्रकार-

जुळ्या बाळांचे Fraternal आणि Identical हे दोन प्रकार असतात-

Fraternal-

जेव्हा दोन शूक्राणू व दोन स्त्रीबीजांचे फलन होऊन एकाच वेळी गर्भाशयात दोन गर्भधारणा होतात तेव्हा त्या प्रकाराला Fraternal अथवा नॉन-आयडेंटीकल जुळी असे म्हटले जाते.ही दोन भावंडे समान लिंगाची अथवा भिन्न लिंगाची असू शकतात.

Identical-

जेव्हा एकच स्त्रीबीजाचे फलन होते पण त्याचे विभाजन होऊन त्यामुळे दोन गर्भ धारण होतात तेव्हा त्या प्रकाराला आयडेंटीकल जुळी असे म्हणतात.हे दोन्ही गर्भ एकाच जीन्स अथवा गुणसूत्राचे असतात.त्यामुळे या प्रकारातील जुळी बाळे समान लिंगाची व एकसारखीच दिसणारी असतात.

गरोदपणामुळे तुम्हाला मातृत्व लाभत असले तरी तुम्ही या काळात काळजी घेण्याची  फार आवश्यक्ता अाहे.जर तुमचे शरीर त्या गर्भाची वाढ पोषण करण्या इतपत निरोगी व पोषक असेल तरच तुम्ही सुदृढ बाळांना जन्म देऊ शकता.यासाठी जुळ्या बाळांना जन्म देण्यासाठी माता देखील तितकीच सुदृढ असणे आवश्यक आहे.तुमच्या आहारातून तुमच्या गर्भांना कमीतकमी २७०० कॅलरीज,पुरेसे कॅल्शियम व लोह याचा पुरवठा होईल याची काळजी घ्या.

तुम्हाला जुळ्या बाळांमुळे कदाचित लवकर प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार असेल तर त्याची आधीच तयारी करुन ठेवा.तुमच्या डॉक्टराकडून प्रसूतीपूर्व आरोग्य काळजी, हॉस्पिटल,तिथल्या सुविधा,नवजात शिशू अतिदक्षता विभाग याविषयी आधीच माहिती घ्या.डिलेव्हरीसाठी हॉस्पिटल्समध्ये जाताना तुमच्या सोबत या 23 वस्तू ठेवा !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

शरीरावरील या ’4′भागांवरचे केस मूळीच उपटू नका !

$
0
0

शरीरावर विचित्र ठिकाणी केसांची वाढ होत असेल तर ते अनावश्यक केस ताबडतोब काढून टाकण्याचा मोह होतो. पण अशाप्रकारे केस काढून टाकणं त्रासदायकही ठरू शकते. म्हणूनच डरमॅटोलॉजिस्ट डॉ. चंदन जयस्वाल यांनी दिलेला हा खास सल्ला  नक्की जाणून घ्या. कारण अनावश्यक केस काढण्याच्या विविध उपचारपद्धतींचेही आहेत दुष्परिणाम 

1. स्तनाजवळ : स्तनांजवळ विरळ स्वरूपात केस असणं सामान्य आहे. ते उपटण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. ट्विझरने केस उपटल्याने इन्फेक्शन होऊ शकते. विनाकारण 2 मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. अगदीच गरज असेल तर  स्तनाजवळील केसांना उपटण्याऐवजी ट्रीम करा.

2. आयब्रो - कपाळावरील आयब्रो हा देखील एक नाजूक भाग आहे. सतत त्या जागेवरील केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सला त्रास होऊ शकतो. ब्युटी पार्लरमध्ये तज्ञांद्वारा भुवयांना शेप देणं सुरक्षित आहे. परंतू स्वतःहून भुवयांजवळील केस उपटू नका. थ्रेडींगने आयब्रो केल्यानंतर होणारा त्रास दूर करतील या खास टीप्स !

3. चामखिळी : अनेकदा शरीरावरील चामखिळीतून केस उगवतो. पण अशाप्रकारचे केस खेचून काढू नका. तसे केल्याने तीव्र वेदना होतात सोबतच इन्फेक्शनचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे चामखिळीतून केस उपटून काढण्याचा मोह टाळा. तुम्हांला अशाप्रकारचे केस त्रासदायक वाटत असतील तर ट्रीम करा किंवा लेझर हेअर रिड क्शनच्या मदतीने योग्य आणि सुरक्षित पद्धतीने काढा.

4. इन्ग्रोव्हन हेअर : वॅक्सिंग किंवा रेझरमुळे शरीरावर इन्ग्रोव्हन केस वाढतात. असे केस ट्विझिंगने काढणं त्रासदायक ठरतं. यामुळे स्कार / डाग किंवा इंफेक्शनचा त्रास वाढतो. पण तुम्हांला इन्ग्रोव्हन केसांचा त्रास कमी करायचा असेल तर डरमेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि त्यानुसार पुढील उपचार पद्धती निवडा.  याचप्रमाणे प्युबिक एरियावरील केस काढण्यासाठी हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करावा का ?

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

मुलगा वयात आला याचे संकेत देतात ही ’5′लक्षणं !

$
0
0

मुलांनी प्रौढ वयात प्रवेश करण्याचा काळ म्हणजे पौगंडावस्था.या अवस्थेमध्ये मुलांमध्ये हॉर्मोनल,शारीरिक आणि भावनिक असे अनेक बदल होतात.पौगंडावस्था अनुभवणा-या  मुलांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.त्यामुळे या अवस्थेतील बदल समजून घेणे मुलांसाठी फारच कठीण असते.अनेक लोकांना विशेषत: पालकांना या काळात मुलांमध्ये मूड स्वींग,आक्रमकता,बंडखोरपणा व मुलांचे संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलण्याचा अनुभव येऊ शकतो.त्याचप्रमाणे पौगंडावस्थेत शरीरात होणा-या हॉर्मोनल बदलांमुळे मुलांमध्ये अनेक भावनिक बदल देखील जाणवू लागतात.ब-याचदा पौगंडावस्थेत १२ ते १४ वर्षांच्या मुलांमध्ये शारीरिक बदलांमुळे मुड बदलत असल्याचे दिसून येते.असे असले तरी देखील अशा मुलांना या काळात त्यांचे पालक अथवा मोठ्या माणसांशी याबाबत संवाद साधणे कठीण जाते.चाईल्ड सायकॉलॉजिस्ट डॉ. सुची दळवी यांच्यामते पौगंडावस्था ही प्रत्येकासाठी निरनिराळी असू शकते.यासाठी जाणून घ्या आजकाल मुलांमध्ये पौगंडावस्था लवकर येण्याची 5 प्रमुख कारणंं

डॉ. सुची दळवी यांच्याकडून जाणून घेऊयात मुलांमधील पौगंडावस्थेत त्यांच्यामध्ये जाणवणारी ही काही सामान्य लक्षणे-

  • मुलांमधील पौगंडावस्थेचे प्राथमिक लक्षण म्हणजे या काळात त्यांचे टेस्टीकल म्यॅच्युर्ड होतात.त्यांच्या टेस्टीकलचा आकार वाढतो पण Scrotum मात्र लहान होतात व त्यांचा रंग देखील जास्त गडद होतो.

  • तसेच पेल्विक भाग देखील पेनिस सह गडद रंगाचा दिसू लागतो

  • काखेत व प्युबिक भागात केस येण्यास सुरुवात होते.

  • पौगंडावस्थेतकाही मुलांना चेह-यावर देखील केस (दाढी व मिसरुड ) येऊ लागतात.तर काही मुलांना चेह-यावर केस (दाढी व मिशी) उशीरा येतात.

  • पौगंडावस्था ही अशी अवस्था असते ज्यामध्ये मुले सेक्शुअली प्रौढ होतात.त्यामुळे जाणून घ्या या अवस्थेत मुलांना पॉर्न बघण्यापासून कसे परावृत्त कराल ?

  • तसेच या काळात मुलांचे सेक्शुअल इच्छेमुळे जाणिवपुर्वक इरेक्शन देखील होऊ लागते.

  • मुलांना पौगंडावस्थेत घाम अधिक येऊ लागतो.

  • मुलांच्या आवाजात बदल जाणवू लागतात व आवाज घोगरा होतो.

  • अनेक मुलांच्या त्वचेमध्ये देखील यामुळे बदल होतात.अचानक त्यांची त्वचा तेलकट अथवा कोरडी होते व त्वचेवर अॅक्ने येऊ लागतात.

  • पौगंडावस्थेत मुलांमध्ये अनेक भावनिक बदल जाणवतात.त्यांच्यामध्ये मूडस्वींग होणे,एकलकोंडेपणा व आक्रमकता या गोष्टी आढळू लागतात.या सर्व बदलांसह त्यांच्यामध्ये शारीरिक बदल विशेषत: त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात.तसेच त्यांच्यामध्ये कमी आत्मसन्मान व लोकांसमोर असलेली त्यांची शारीरिक प्रतिमा याबाबत समस्या देखील जाणवतात.यासाठी तुमची मुलं लपून सिगारेट, ड्रग्ज घेतात का ? हे ओळखण्याचे ’9′ संंकेत देखील जरुर वाचा.

पौगंडावस्था ही मुलांमधील अशी अवस्था असते ज्यावेळी मुलांना पालकांचा आधार व समजूतदारपणाची अधिक गरज असते.एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसोबत संवाद साधून त्यांच्या आयुष्यात घडणारे बदल हे त्यांच्या वाढीमधील अगदी सामान्य बदल असून त्यात काहीही अयोग्य व लाजिरवाणे नाही हे त्यांना समजावून सांगायला हवे.त्याचप्रमाणे मुलांच्या मनातील शंका व चिंतावर तुम्ही उत्तर देण्यासाठी सतत तयार असायला हवे.यासाठी मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग ! जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

नाकामध्ये येणारे वेदनादायक फोड धोकादायक असतात का?

$
0
0

नाक हा आपल्या चेह-यावरील एक महत्वाचे ज्ञानेद्रिय आहे.चाफेकळी नाकामुळे एखाद्याचे सौदर्य अधिक खुलून दिसू शकते.तसेच नाक हा अवयव श्वसनक्रियेसाठी देखील ते फार महत्वाची ठरतो.मात्र आजकाल वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे नाकामध्ये निरनिराळे विकार निर्माण होतात.प्रदूषणामुळे सर्दी होणे,नाक चोंदणे,शिंका येणे अथवा श्वसन समस्या अशा निरनिराळ्या समस्या निर्माण होतात.तर कधीकधी नाकामध्ये अचानक एखादा फोड अथवा बॉइल निर्माण झाल्यास देखील खूप वेदना होऊ लागतात.

शरीराच्या इतर भागावर येणा-या बॉइल पेक्षा नाकपुडीच्या आतील बाजूस येणारे बॉइल फारच त्रासदायक असतात.कारण एकतर आपल्या नाकाचा आतील भाग हा फारच संवेदनशील असतो.त्यामुळे नाकात फोड अथवा बॉइल आल्याने तुम्हाला त्याचा त्रास अधिक प्रमाणात जाणवू लागतो.या फोडांमुळे तुम्हाला अगदी दैनंदिन व्यवहारात चेहरा धुणे अथवा नाक साफ करणे अशा कामांमध्ये देखील अडचणी येतात.तसेच जर हा फोड नाकामध्ये अगदी आतल्या भागात असेल तर तुम्हाला तो दिसतही नाही व त्यावर एखादे औषध लावून उपचार देखील करता येत नाहीत.यासाठी नाकामध्ये होणा-या बॉइल अथवा फोड या समस्येबाबत डर्माटॉलॉजिस्ट डॉ.राजेश कंधारी यांचा हा सल्ला जरुर जाणून घ्या.तसेच जाणून घ्या या ’10′ कारणांमुळे नाकातून रक्त वाहते !

नाकामध्ये बॉइल अथवा  फोड का येतात?

नाकामध्ये बॉइल अथवा  फोड येण्यासाठी Staphylococcus Aureus हे बॅक्टेरीया कारणीभूत असतात.डॉ.कंधारी यांच्यामते काही लोक हे बॅक्टेरीया कॅरीयर स्थितीत असतात.ज्यामुळे हे विषाणू त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात वास करतात.या स्थितीत जरी ती व्यक्ती संसर्गजन्य असली तरी तिच्यामध्ये तशी लक्षणे मात्र आढळत नाहीत.पण ही स्थिती संसर्गजन्य नक्कीच असू शकते.

काहीवेळा नाकाच्या आतील पडद्याला नखांनी खाजवणे अथवा खरवडणे यामुळे तिथे जखम होते.कधीकधी थंड वातावरणामुळे देखील नाकाच्या आतील पडद्याचा भाग सुकतो.या स्थितीचा फायदा हे बॅक्टेरीया घेतात.ज्यामुळे नाकामध्ये Nasal vestibulitis अथवा नाकाच्या केसांमध्ये समस्या निर्माण होतात.Atopic dermatitis ची समस्या असलेल्या लोकांना देखील नाकामध्ये बॉइल अथवा फोड येण्याचा धोका असू शकतो.

नाकामध्ये बॉइल अथवा फोड आल्यास काय समस्या निर्माण होऊ शकतात?

नाकामध्ये बॉइल अथवा फोड येणे या समस्येकडे आपण ब-याचदा एक साधी त्वचा समस्या समजून दुर्लक्ष करतो.पण डॉ.कंधारी यांच्या मते या समस्येकडे कधीच दुर्लक्ष करु नये.कारण त्यांच्या मते कधीकधी हे फोड दाबले जातात व त्यांचा समुह अथवा जाड थर तयार होतो.तसेच यामुळे कधीकधी Nasal abscess ही समस्या देखील निर्माण होऊ शकते.ज्या समस्येमध्ये बॅक्टेरीयल इनफेक्शनमुळे नाकाच्या आतील भागात पू निर्माण होऊ शकतो.

आपण कधीच नाकामधील फोड अथवा बॉइलकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण ते अतिशय  धोकादायक भागात झालेले असतात.नाकाचा त्रिकोणी भाग हा आतील बाजूने आपल्या तोडांजवळ जोडलेला असून त्याची आतली बाजू अतिशय संवेदनशील असते.त्या भागातील रक्तपुरवठा करणा-या जाळ्यांना जर या इनफेक्शचा प्रादूर्भाव झाला तर त्याचा संसर्ग थेट मेंदूपर्यंत पसरु शकतो.

डॉक्टरांच्या मते मधुमेह व रोगप्रतिकार शक्ती कमजोर असलेल्या लोकांनी या भागात फोड आल्यास विशेष दक्षता घ्यावी.कारण मधुमेहींमध्ये नाकामध्ये बॉइल येणे ही समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता असते.तसेच या समस्येवर वेळीच उपचार नाही केले तर ही समस्या गंभीर देखील होऊ शकते.

जाणून घ्या नाकामध्ये बॉइल झाल्यास याबाबत नेमकी काय काळजी घ्यावी-

  • डॉ.कंधारी यांच्यामते सर्वात पहिली व महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही नाक खरवडू नये.तसेच जर तुम्हाला तीव्र पिम्पल्स येण्याची समस्या असेल तर अशावेळी ते पिम्पल्स फोडण्याचा मोह टाळा व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करा.कारण पिम्पल्स फोडल्यामुळे त्याचे इनफेक्शन तुमच्या त्वचेत खोलवर पसरु शकते.

  • डॉक्टरांच्या मते नाकाच्या आतमध्ये कोणतेही तेल अथवा मॉश्चराइजर लावू नये.कारण ते तेल अथवा मॉश्चराइजर गोठून नंतर तुमच्या नाकाच्या आतील त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो.

  • नाक कडक झाले असेल तर ते साफ करण्यासाठी नाक पिळून अथवा शिंकरुन नाकामध्ये जखम करणे टाळा.

  • नाकामधले येणारे बॉइल आपोआप बरे होतात.पण तसे नाही झाले तर याबाबत त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.तसेच यासोबत जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय हे देखील जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ५ गोष्टींचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो !

$
0
0

तुम्ही दररोज रात्री ८ वाजता जेवता.कधीही रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत नाही किंवा झोपताना इलेक्ट्रॉनिक वस्तूही जवळ बाळगत नाही पण तरीही रात्री तुम्हाला निवांत झोप येत नाही? असे का घडते.तुम्हाला शांत झोप न येण्याचे नेमके कारण समजत नसेल तर लक्षात ठेवा झोपमोड होण्यामागे तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत असू शकते.तसेच रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

डाएटीशन व न्यूट्रीशनिस्ट डॉ.स्वाती दवे यांच्याकडून जाणून घेऊयात झोपेची गोळी न घेता देखील शांत झोप लागण्याचे हे पाच सोपे उपाय-

1. चांगल्या आरामदायक बेडची निवड करा-

जर तुमचा बेड खूपच सॉफ्ट असेल तर तुम्हाला त्यापेक्षा थोड्या टणक बेडची गरज असू शकते.अल्ट्रा सॉफ्ट बेड कमी आरामदायक असतात.ज्यामुळे अंगदुखी व झोपमोड देखील होते.त्याचप्रमाणे तुमच्या मॅटट्रेसमध्ये देखील गुठळ्या नाहीत याची नीट दक्षता घ्या.निवांत झोप येण्यासाठी आरामदायक उशी घ्या.उशी जास्त मऊ अथवा जास्त टणक नसल्यास तुमच्या मानेला निश्चितच चांगला आधार मिळेल.तसेच उशीला नेहमी सुती कव्हर घाला.तसेच वाचा या शांत झोप मिळवण्याच्या ’5′ सोप्या ट्रिक्स !

2. बेडरुमचे तामपान योग्य व नियंत्रित ठेवा-

चांगल्या निवांत झोपेसाठी बेडरुमचे तापमान अतिथंड अथवा अतिउष्ण असे दोन्हीही नसावे.शांत झोपेसाठी आदर्श तापमान हे नेहमी ५० टक्के आद्रतेसह २५ अंश सेल्सियस असावे.त्यामुळे एकदा का बेडरुममधील वातावरण योग्य प्रमाणात उबदार झाले की तुमचे बेड वर्मर अथवा हिटर बंद करा.कारण रात्रभर ते सुरु ठेवल्यास तुमच्या बेडरुम मधील आद्रता कमी होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला पुरेसे आरामदायक वाटणार नाही.एअरकंडीशनर वापरताना देखील हेच नियम पाळावेत.त्याचप्रमाणे शांत झोपेसाठी घरातील या ’7′ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.

3. रात्रीचे हलके जेवण घ्या-

तुम्ही रात्री काय खाता यापेक्षा तुम्ही किती वाजता जेवता हे खूप महत्वाचे आहे.डॉ.स्वाती यांच्यामते झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवल्यामुळे तुमचे पचन चांगले होते व तुम्हाला झोप देखील चांगली लागते.तसेच तुम्ही रात्री हलका आहार घ्याल याची पुरेशी दक्षता घ्या कारण जड जेवणामुळे तुम्हाला अपचन व पचनासंबधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.जाणून घ्या कसे शांत झोप मिळवण्यासाठी ‘जायफळ’ फायदेशीर !

4. दररोज ठराविक वेळीच झोपा-

लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य-संपदा लाभे असे पूर्वी सांगण्यात यायचे ते खरेच आहे.यासाठीच ठराविक वेळी झोपा व सकाळी लवकर उठा.तुमच्या झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न बदलू शकतो.झोपेची वेळ पाळल्यामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही सात तास झोप घेण्याची शिस्त पाळण्यास मदत होते व ज्यामुळे तुमची झोपमोड होत नाही.त्याचसोबत दिवसा खूप वेळ झोप घेणे टाळल्यास तुम्हाला रात्री शांत झोप  नक्कीच लागू शकते.यासाठी वाचा दिवसा सारख्या येणाऱ्या झोपेवर काही सोपे उपाय!

5. बेडरुममध्ये अंधार करा-

जसे रात्री जोरजोरात आवाज ऐकल्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते अगदी तसेच प्रकाशामुळे देखील तुमची झोपमोड होते.यासाठी रात्री झोपताना बेडरुममधील सर्व दिवे बंद करा.तसेच बेडरुममध्ये टीव्ही देखील ठेऊ नका कारण त्यामुळे रात्री मध्येच तुम्हाला टीव्ही पाहण्याची इच्छा होऊ शकते.जर तुम्हाला रात्री वाचन करण्याची सवय असेल तर यासाठी एखादे पुस्तक वाचनासाठी घ्या कारण ई-बूकचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.त्याचसोबत रात्रीच्या शांत झोपेसाठी करा हे ’3′ मिनिटांचे श्वसनाचे व्यायाम !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

वजन कमी करण्यासाठी रोज आहारात फायबर्स किती प्रमाणात असावे ?

$
0
0

वजन घटवण्यासाठी आहारात फायबर्सचा समावेश करणे आरोग्यदायी आहे. परंतू वजन कमी करण्यासाठी फायबरचे नेमके  प्रमाण किती असावे ?  तसंच त्याचे अधिक प्रमाण म्हणजे किती? याची अनेकांना कल्पना नसते. म्हणूनच फायबरच्या सहाय्याने हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी फिटनेस फर्स्ट इंडियाच्या डायटिशियन  Ms. Rina Baliga यांनी मार्गदर्शन केले.

  • वजन कमी करण्यासाठी दिवसाला किती फायबरयुक्त पा खाणे आवश्यक आहे?

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार घेणे. दिवसाला जर तुम्ही १००० कॅलरीज घेत असाल तर त्यात १४ ग्रॅम फायबर्स असणे आवश्यक आहे. म्हणून वजन कमी करण्यासाठी दिवसभरात केव्हाही २५-४० ग्रॅम फायबर घ्या. वजन घटवताना अवेळी लागणार्‍या भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स

  • आहारातून फायबरचे प्रमाण कसे वाढवावे?

यासाठी तुम्हाला फायबरचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्याचे bowel movement मधील कार्य जाणून घेणे गरजेचे आहे. गॅस्ट्रिक ज्यूस आणि डायजेस्टिव्ह एन्झाइम्स याचा परिणाम तुम्ही घेतलेल्या अन्नावर होतो. त्यानंतर पचलेले अन्न छोट्या आतड्यात जाते तिथे पोषकतत्त्व तयार होतात, शरीरात शोषली जातात व रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पसरतात. परंतु, फायबरचे पचन होत नाही कारण त्याच्या पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाईम आपल्या शरीरात नसते. म्हणजेच फायबरचे पचन होत नाही किंवा शरीरात शोषण होत नाही. याचा अर्थ अन्नातून शरीरात फायबरचे प्रमाण वाढत नाही. पोटाची चरबी कमी करण्यात, ‘ कडूलिंबाची फुले’ गुणकारी !

  • वजन कमी करण्यासाठी कुठल्या प्रकारचे फायबर चांगले असतात?

अन्नातील फायबर्स पोटातील लिक्विड (द्रव पदार्थ) धरून ठेवतात. त्यामुळे bowel movement सुरळीत होते. फायबर दोन प्रकारचे असतात.- सोल्युबल फायबर आणि इन्सोल्युबल फायबर. पचन संस्थेतून अन्नप्रवाह सुरळीत होण्यास इन्सोल्युबल फायबर्सची मदत होते. तर सोल्युबल फायबर्समुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल, फॅट्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. कारण सोल्युबल फायबर्स मुळे साखर व फॅट्स रक्तात सावकाश मिसळतात  आणि शरीराला नियमित ऊर्जेचा पुरवठा करतात. त्याचबरोबर फायबरचे प्रमाण कमी असलेल्या किंवा काहीच नसलेल्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण चटकन वाढते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे तुम्ही अधिक खाता. परिणामी वजन वाढते. त्याचबरोबर फायबर्स युक्त अन्नपदार्थांमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्यामुळे खूप वेळापर्यंत तुमचे पोट भरलेले राहते. परिणामी वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. महिन्याभरात वजन कमी करण्यास ‘काळामिरी’ उपयुक्त

  • अधिक प्रमाणात फायबर म्हणजे किती?

सामान्यपणे एका व्यक्तीने दररोज ४० ग्रॅम पेक्षा अधिक फायबर्स घेऊ नये. कारण फायबर्सच्या अति प्रमाणामुळे गॅसेस, ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.  डायरिया, बद्धकोष्ठता असे त्रास उद्भवतील. तसंच अपचनामुळे पोटात क्रम्प्स येणे,  आतड्यात ब्लॉकेज होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक यांसारख्या मिनिरल्सचे शरीरात शोषण होण्यास अडथळा निर्माण होईल. आहारात फायबर्सचा अधिक समावेश झाल्यास वाढतील हे ’5′ त्रास !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या फायद्यांसाठी प्रसूतीनंतर नवमातांनी अवश्य मसाज घ्यावा !

$
0
0

गर्भारपणात स्त्रिच्या स्नायूंवर व शरीरावर स्ट्रेस येतो. त्या काळात स्त्रिच्या शरीरात अनेक बदल होतात. पहिल्यांदा प्रेग्नेंट राहिल्यानंतर बऱ्याच महिला गोंधळून जातात. आपल्या शरीराला नेमकी कशाची गरज आहे, हे समजणे कठीण होते. नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

परंतु, यासाठी post-natal massage यांसारख्या काही नैसर्गिक थेरपींनी फायदा होईल. त्यामुळे  प्रसूतीवेदना सुसह्य होण्यास आणि मातेला ऊर्जा, उत्साह परत मिळवून देण्यास मदत होते. post-natal massage मुळे प्रसूतीनंतरचा ताण कमी होतो व स्नायूंची लवचिकता वाढते. त्याचबरोबर मसाज केल्याने दूध निर्मिती वाढवणाऱ्या Oxytocin या हार्मोनची निर्मिती होते. तसंच योग्य पद्धतीने मसाज केल्यास चांगली झोप येते आणि रक्ताभिसरण सुधारते. The Himalaya Drug Company च्या  Research Associate – R&D च्या Dr. Subhashini N.S यांनी याबद्दल मार्गदर्शन केले.

  • प्रसूतीनंतर किती कालावधीनंतर नवमातेने मसाज घ्यावा?

प्रसूतीनंतर मसाज घेणे हा नवमातेसाठी फायदेशीर असते. प्रसूतीनंतर आवश्यक असलेला मसाज नवमातेला लवकरात लवकर मिळणे आवश्यक आहे. परंतु, प्रसूतीनंतर ६-७ आठवड्यांनंतर मसाज घ्यावा, असा सल्ला अनेक डॉक्टर देतात.

  • प्रसूतीनंतर मसाज घेतल्यास खरंच फायदा होतो का आणि कसा?

अभ्यासानुसार प्रसूतीनंतर घेतलेल्या मसाज थेरपीमुळे चिंता, नैराश्य दूर होण्यास मदत होते. स्नायू, सांधे रिलॅक्स होतात आणि नवमातेचे आरोग्य सुधारू लागते. रक्तप्रवाह सुधारतो. lymphatic drainage मुळे शरीरातील अतिरिक्त फ्लुईड आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या दुध निर्मितीत वाढ होते. त्वचेला फर्मनेस येतो. त्वचा हायड्रेटेड, मऊ व कोमल होते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर घेतलेला मसाज पाठदुखी, डोकेदुखी, ताण, चिंता आणि प्रसूतीनंतर येणारे नैराश्य यावर अत्यंत परिणामकारक ठरतो. ताण कमी होवून संपूर्ण शरीराला आराम मिळतो आणि थकवा दूर होवून शांत झोप येण्यास मदत होते. प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !

  • हा मसाज किती वेळा घ्यावा?

मसाज केल्याने शरीर व मन रिलॅक्स होवून ते एकमेकांशी सुसंगत होते. मसाज घेतल्याने मातेच्या भावनिक आणि शारीरिक गरजांचा समतोल राखला जातो. साधारणपणे प्रसूतीनंतर महिनाभर रोज तेलाने मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा अनेक नवमातांना प्रसूतीनंतर पहिल्या सहा महिन्यात ६ वेळा मसाज घेण्याचा सल्ला दिला जातो.

  • post-natal massage  घेताना  कोणती काळजी घेणे गरजेचे आहे?

प्रथमतः मसाज करण्यासाठी योग्य तेलाची निवड करा. तसंच मसाज योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक तेलाचे वेगवेगळे फायदे असतात. त्यामुळे परिणामकारक मसाज मिळण्यासाठी योग्य तेलाची निवड करणे महत्त्वाचे आहे. तिळाचे तेल, कोरफड यांसारखे हर्बल प्रॉडक्स तुम्ही वापरू शकता. त्यामुळे शरीर रिलॅक्स होवून तुम्हाला उत्साही वाटेल. मसाज्याचे फायदे मिळण्यासाठी तो योग्य पद्धतीने करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक क्षमतेचा परिणाम निश्चितच आरोग्यावर होतो. ब्रेस्टफिडींग वीक : नवमातांचे दूध वाढवतील आयुर्वेदाने सुचवलेले हे ’5′ घरगुती उपाय

  • मसाज घेण्याचा कालावधी किती असावा?

प्रसूतीनंतर घेण्यात येणारा मसाज साधारणपणे ३०-४५ मिनिटे घ्यावा, असा सल्ला दिला जातो. यामुळे लवकर पूर्ववत होण्यास मदत होते. तसंच मसाज घेताना नवमातेने त्याचा आनंद जरूर घ्यावा.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


ताण तणावामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढतो का ?

$
0
0

चेहर्‍यावर एखादा जरी पिंपल वाढताना दिसला तरीही अनेकदा तरूण मंडळी बैचेन होतात. अनेकांचा असा विश्वास आहे की, ताणतणावामुळे अ‍ॅक्ने वाढतात. पण तुमच्यावरील ताण  तणाव अ‍ॅक्नेची समस्या वाढवण्यास कसे कारणीभूत ठरते हे जाणून घेण्यआधी अ‍ॅकने कसे वाढतात हे समजणे गरजेचे आहे.

 मुंबईस्थित फोर्टिस हॉस्पिटलच्या कन्सल्टंट डरमॅटोलॉजिस्ट डॉ. स्मृती नस्वा यांच्या सल्ल्यानुसार, रक्तातील अशुद्धतेपेक्षा शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. ताण तणाव  हे अ‍ॅक्नेच्या त्रासामागील मूळ कारण नसून त्याच्यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढायला मदत होऊ शकते.

  • ताण तणाव  आणि अ‍ॅक्नेचा एकमेकांशी कसा संबंध आहे ?

परीक्षेच्या आधी किंवा लग्नाच्या अवघे काही दिवस आधी अनेक तरूण-तरूणींच्या चेहर्‍यांवर अचानक पिंपल वाढतात.

Stanford University ने 2003 साली केलेल्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार, Archives of Dermatology  [1] ने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या मौसमामध्ये ताण तणाव वाढल्याने तरूणांम्ध्ये अ‍ॅक्नेचा त्रास वाढत असल्याचेही आढळते. ताणतणावाचा शरीरावर जसा परिणाम होतो तसाच त्वचेवरही होतो. जसा तुमच्यावर ताण वाढतो. तसे तुमच्या शरीरातील हार्मोनल्सचे सिक्रीशन होण्याचे प्रमाणही वाढते. Androgens किंवा cortisol हे स्ट्रेस हार्मोन्स आहेत. त्यांचे प्रमाण वाढते. या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने सेबल हे त्वचेतील तेलही वाढते. या हार्मोन्सचे आरोग्यावरही परिणाम होत असल्याने तुमचा  ताण तणाव हलका करणं गरजेचे आहे. अन्यथा अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही औषधं गोळ्या वापरत असाल तर त्याचाही फारसा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही.

तरूणांमध्ये अ‍ॅक्नेचा त्रास वाढणं ही समस्या अगदीच सामान्य असते. वयाच्या या टप्प्यावर मुरूमं किंवा तारुण्यपिटीका येणं सहाजिकच असते. डॉ. स्मृती सिंग यांच्या सल्ल्यानुसार,तारुण्यपिटीकांचा त्रास हा मुलं वयात येताना ताणतणावामुळे पिंपल्सचा त्रास अधिक वाढवतात. त्यामुळे वेळीच तुमच्या चेहर्‍यावर पिंपल्स वाढण्यामागील नेमके कारण काय हे ओळखा आणि त्यावर तात्काळ उपचार करा. तुमच्यावरील ताण तणाव हलका करण्यासाठी योगासनं किंवा ध्यानसाधना करणं नक्कीच फायदेशीर ठरेल. तुमचा एखादा छंद जोपासल्यानेही ताण कमी होण्यासाठी मदत होते. तुमच्यावरील ताण जितक्या लवकर कमी करता येईल तितका अ‍ॅक्नेशी सामना करणं सुकर होतं. प्रामुख्याने तरूणाईत हा त्रास अधिक असल्याने ताण हलका करण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

References:

  1. Chiu A, Chon SY, Kimball AB. The response of skin disease to stress: changes in the severity of acne vulgaris as affected by examination stress. Arch Dermatol. 2003 Jul;139(7):897-900. PubMed PMID: 12873885.

बाळाला बोअरवेलच्या पाण्याने अंघोळ घालणे सुरक्षित आहे का ?

$
0
0

माझे बाळ ५ महिन्यांचे आहे.मी त्याला बोअरवेलच्या पाण्याने अंघोळ घालू शकते का? माझ्या परिसरात फक्त बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा होतो त्यामुळे माझ्याकडे पाण्याचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर मी काय करावे?

या शंकेबाबत द्वारका येथील व्यंकटेश्वर हॉस्पिटलचे Paediatrics आणि Neonatology विभागाचे एचओडी व सिनियर कन्सल्टंट Dr Sunil Mehendiratta यांचा हा महत्वाचा सल्ला जरुर जाणून घ्या.

बोअरवेलचे पाणी जड असते त्यामुळे त्याचा त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो.सहाजिकच बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी व अंघोळीसाठी मुळीच सुरक्षित नाही.बोअरवेलचे पाणी हे ग्राउंड वॉटर असते.ग्राउंड वॉटर असल्याने ते प्रदूषित असते.ज्यामध्ये जड धातु, POPs(persistent organic pollutants) सेद्रिंय प्रदूषक घटक व न्यूट्रिशन्ट असतात ज्यांचा त्वचेवर विपरित परिणाम होत असतो.बोअरवेल चे पाणी निंजर्तुक देखील नसल्याने ते बाळाला अंघोळ घालण्यासाठी नक्कीच सुरक्षित नाही.अंघोळ घालताना हे पाणी बाळाच्या तोंडात गेल्यास बाळ आजारी देखील पडू शकते.यासाठी वाचा उकळलेले,गाळलेले की बाटलीबंद पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे ?

ग्राउंड वॉटरने अंघोळ केल्यामुळे प्रौढांमध्ये देखील त्वचेवर खाज येणे,त्वचा कोरडी व रुक्ष होणे,गजकर्ण(eczema),केसगळती व इनफेक्शन अशा अनेक त्वचा व केसांबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.तुमच्या बाळाची त्वचा तर फारच नाजूक व सौम्य असते.त्यामुळे बाळाच्या त्वचेची  याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

मात्र जर तुम्हाला अंघोळीसाठी बोअरवेलचे पाणी वापरण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर ते पाणी आधी स्वच्छ करुन मगच अंघोळीसाठी वापरा.

यासाठी बोअरवेलचे पाणी वापरण्यापूर्वी ते RO च्या माध्यमातून फिल्टर करुन घेणे हाच एक सुरक्षित व उत्तम मार्ग असू शकतो.तसेच तुम्ही अंघोळीपूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी त्या पाण्यामध्ये तुरटीचा देखील वापर करु शकता.पाण्यावरुन तुरटी फिरवणे हा पाणी स्वच्छ करण्याचा एक कमी खर्चिक पर्याय आहे.मात्र बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी बाळाच्या त्वचेवर बॉडी ऑइल जरुर लावा ज्यामुळे अंघोळीनंतर बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही.तसेच बाळाला अंघोळ घालण्यासाठी वापरण्यात येणारी अंघोळीची साधने देखील योग्य गुणवत्तेची निवडा.बाळाला अशा पाण्याने लवकर अंघोळ घाला कारण बराच वेळ अंघोळ घातल्याने बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्याची त्वचा कोरडी पडू शकते.बाळाला अंघोळ घातल्यावर लगेच त्याचे अंग पुसून कोरडे करा व त्याला योग्य प्रकारे मॉश्चराईज करा.जाणून घ्या लहान मुलांसाठी साबण आणि शाम्पू वापरायला सुरवात कधी कराल ?

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

आतड्यांंचा कॅन्सर –कोणत्या टप्प्यात त्याची गंभीरता किती ?

$
0
0

कोलन कॅन्सरचे निदान झाल्यास त्याच्या पुढची पायरी म्हणजे कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे ते जाणून घेणे. यामुळे कॅन्सरस सेल्स किती लांब पसरलेत याची माहिती मिळते व त्यानुसार ट्रीटमेंट करता येते. Cytecare Hospital चे Senior Consultant – Gastrointestinal आणि HBP Surgical Oncology, Dr.  Kenneth D’ Cruz, यांनी कॅन्सरचे चार टप्पे सांगून त्यावरच्या ट्रीटमेंट आणि कोलन कॅन्सरने पीडित व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता यावर मार्गदर्शन केले.

कॅन्सरचे टप्पे: साधारणपणे कोलन कॅन्सरचे चार टप्पे आहेत. परंतु, कोलनचे स्वरूप आणि सेल्स कोलन पासून किती दूर पर्यंत पसरले आहेत यावरून पुढे याचे वर्गीकरण केले जाते.

colon-cancer-stages

पहिला टप्पा : कोलन कॅन्सरच्या सुरवातीच्या टप्प्यात कोलनच्या आवरणावर mucosa आणि submucosa हे कॅन्सरस सेल्सची वाढ होऊ लागते.

दुसरा टप्पा : दुसऱ्या टप्प्यात सेल्स कोलनच्या बाहेर पडून कोलनच्या इतर भागात पसरतात. यावरून त्यांचे 2A, 2B आणि 2C, यामध्ये वर्गीकरण केले जाते. 2A मध्ये कॅन्सरस सेल्स हे कोलनच्या बाहेरील आवरणापर्यंत पोहचलेले असतात. 2B च्या टप्प्यात बाहेरच्या आवरणापासून ते membranes पर्यंत पोहचतात. आणि 2C च्या टप्प्यात सेल्स जवळच्या अवयवांपर्यंत पसरू लागतात. या ’10′ लक्षणांनी पोटाचा कॅन्सर वेळीच ओळखा !

तिसरा टप्पा: या टप्प्यात कॅन्सरस सेल्स lymph nodes च्या जवळ पोहचतात. त्यानंतर किती lymph nodes वर कॅन्सरस सेल्सचा परिणाम झालाय यावरून त्याचे 3A, 3B आणि 3C असे वर्गीकरण होते. 3A मध्ये कोलन जवळ असलेल्या lymph node वर परिणाम होतो. जर २-३  lymph node वर परिणाम झाला तर तो 3B चा टप्पा असतो. आणि ४ पेक्षा अधिक lymph node वर परिणाम दिसून आला तर तो 3C चा टप्पा असेल.

चौथा टप्पा: हा कॅन्सरचा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात कॅन्सरस सेल्स शरीराच्या इतर अवयवांनापर्यंत पोहचतात. जवळच्या अवयवांवर म्हणजे यकृत किंवा फुफ्फुसांवर याचा परिणाम होतो. याचे वर्गीकरण साधारणपणे 4A, 4B असे होते. 4A मध्ये कॅन्सरस सेल्स जवळपासच्या अवयवांवर परिणाम करतात तर  4B मध्ये कॅन्सरस सेल्स दूरच्या एखाद दुसऱ्या अवयवांपर्यंत पसरतात.

कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे यावरून त्यावरची ट्रीटमेंट ठरते. सामान्यपणे पहिल्या ते तिसऱ्या टप्प्यात सर्जरी करून कोलन कॅन्सरचा ट्युमर काढला जातो. परंतु, उशिरा म्हणजे तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या काळात कॅन्सरस सेल्सचा परिणाम इतर अवयवांवर होऊ नये म्हणून किमोथेरपी आणि सर्जरी दोन्ही केले जाते. शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हे कॅन्सर ट्रीटमेंटचे परिणामकारक उपाय आहेत. चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

कॅन्सर झाल्यानंतर सुरक्षित राहण्याची शक्यता किती आहे?

हे सुद्धा कोलन कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे, तसंच वय, ग्रेड, माणसाचे आरोग्य यावर अवलंबून आहे. मायक्रोस्कोपमध्ये सेल्सचे परीक्षण करून सेल्स किती हेल्दी आहेत यावरून कॅन्सरचे ग्रेडिंग होते. ग्रेड हाय असल्यास सेल्स अधिक अॅबनॉर्मल दिसतात आणि रोग निदान होणे कठीण असते. तर लो ग्रेड कॅन्सर हळूहळू वाढतो आणि रोगाचे निदान लवकर होते. सामान्यपणे प्रत्येक पेशन्टची जिवंत राहण्याची शक्यता ५ वर्षांपर्यंत ५०% इतकी असते. परंतु, कॅन्सरच्या टप्प्यानुसार ती बदलते. कोलन कॅन्सर पहिल्या टप्प्यात असल्यास जिवंत राहण्याची ५ वर्षांपर्यत शक्यता ९०% असते. दुसऱ्या टप्प्यात ती ८०-८३% असते. तिसऱ्या टप्प्यात ६०% तर चौथ्या टप्प्यात ती ५ वर्षांकरिता ११% इतकी असते. म्हणजेच पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत जिवंत राहण्याची शक्यता कमी होत जाते. कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी या ’7′ सवयी अंमलात आणाच !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

या हेयरपॅकने महिनाभरात केस होतील लांबसडक !

$
0
0

काळेभोर, लांबसडक केस कोणाला नको असतात ? ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. पण जाड, लांबसडक केस मिळण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजेच आहार, तेल, मसाज, आरोग्य, आनुवंशिकता इत्यादी. पण आपली हीच इच्छा महिन्याभरात पूर्ण होईल, असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण हे खरे आहे. जाणून घेऊया कसे ते. नक्की वाचा: केसगळती रोखण्यासाठी दिवसातील ’5 मिनिटं’ हा उपाय नक्की करा

याबद्दल एका तरुणीशी संवाद साधला असता तिने तिचा खरा अनुभव सांगितला. स्वप्नाली राजे असे तिचे नाव असून ती २७ वर्षांची आहे. हीचे केस आधी  केस छोटे, पातळ, कोरडे व निस्तेज होते. केसांना फारशी वाढ नव्हती .इतरांचे सुंदर केस बघितले की आपले देखील घनदाट केस असावे असे तिला वाटत असे. यासाठी तिच्या मैत्रिणीने तिला एक हेयर पॅक सांगितला आणि महिन्याभरात केस वाढतील व मजबूत होतील अशी हमी दिली. आधी तिचा विश्वास बसला नाही मग तिने तो उपाय करायचे ठरवले. शाम्पूच्या वापरामुळे केस गळतीची समस्या वाढते का ?

हेयर पॅक कसा बनवाल ?

एक वाटी दह्यात, २ अंड्याचा सफेद भाग, बदाम तेल, कोरफड आणि मेथीचे दाणे किंवा पावडर घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा व हे मिश्रण आठवड्यातून दोनदा केसांना लावा. अर्धा तास थांबून केस आधी पाण्याने स्वच्छ करा व नंतर शॅम्पू लावा. असे महिनाभर करा आणि स्वतः फरक अनुभवा. चमकदार आणि मजबूत केसांसाठी अंड्याचे घरगुती हेअरपॅक

स्वप्नालीने हा उपाय नियमित केला आणि तिला फरक दिसून आला. तुम्हीही हा उपाय नक्की करून बघा.

परंतु, त्याचबरोबर काही नियम पाळणं आवश्यक आहे. त्यामुळे केसवाढीस मदत होईल.

१. जंक फूड टाळा. घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे

२.  फळांचे रस घ्या.

३. सुकामेवा भरपूर प्रमाणात खा.

४. मांसाहार घ्या. या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव !

५. रोज तेल लावा. रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने ते खरंच अधिक वाढतात का ?

हेयर पॅक लावण्याबरोबरच या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला देखील महिन्याभरात लांबसडक, काळेभोर आणि सुंदर केस मिळतील.

हा उपाय नक्कीच करा. पण त्याआधी कॅलेंडर बघा. आज काय आहे? 1 एप्रिल ……….. एप्रिलफूल…!!!

टीप: वरील उपायाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा फक्त एप्रिल फूल प्रॅंक आहे.

या एक्सपर्ट टीप्स टिकवतील तुमचा उन्हाळ्यात व्यायाम करण्याचा उत्साह !

$
0
0

 उन्हाच्या तीव्र उकाड्यामुळे तुम्हाला जीमला जाणे कंटाळवाणे झाले असेल अथवा कडक उन्हाळ्यामुळे निरुत्साही वाटत असेल किंवा अगदी कोणतीही फिजीकल अॅक्टीव्हिटी करणे नको असे वाटत असेल तर ही माहिती जरुर वाचा.कारण जर वजन कमी करायचे असेल व फीट रहायचे असेल तर उन्हाळ्याचा कितीही त्रास झाला तरी तुम्ही व्यायाम अथवा वर्कआउट टाळू शकत नाही.तसेच वाचा आला उन्हाळा , आरोग्य सांभाळा !

यासाठी मुंबईतील CurveStrength Wellness Fitness Studio चे फीटनेस एंटरप्रेनर व फाउंडर,पर्सनल ट्रेनर विक्रम दत्ता यांच्याकडून वर्कआउट करताना उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी या काही एक्सपर्ट टीप्स जाणून घ्या-

१.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये वर्कआउट करण्यापूर्वी तुमचा व्यायाम चांगला व्हावा यासाठी तुम्ही शरीराला पुरेशी उर्जा मिळेल असे काहीतरी खाणे गरजेचे आहे.यासाठी व्यायामापूर्वी तुमच्या आहारामध्ये खाली दिलेल्या पदार्थाचा जरुर समावेश करा.

  • केळ- यामध्ये हाय पोटॅशियम,व्हिटॅमिन सी,बी६,साखर त्वरीत शोषून घेणे,कमी सोडीयम-ज्यामुळे त्वरीत उर्जा मिळणे हे गुणधर्म असतात.

  • मनुका- यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात,लोह,व्हिटॅमिन बी,कॅरोटीन,व्हिटॅमिन सी व नैसर्गिक साखर असते.

  • डाळिंबाचा रस- पोटॅशियम अधिक मात्रेत असते,व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन के व फायबर असतात.ज्यामुळे स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते व मसल रिकव्हरी देखील जलद होते.

२.जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये रनींग,बायकींग व हायकींग असे हाय इंटेन्सीटी वर्कआउट व इन्डूरन्स-बेस अॅक्टीव्हिटी करता तेव्हा कडक उन्हामुळे तुम्हाला थकवा येतो.यासाठी संध्याकाळी व सकाळी फक्त सौम्य सुर्यप्रकाशामध्येच असे व्यायाम करा.सामान्यत: यासाठी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेमध्ये व्यायाम करु नका असे सांगण्यात येते.कारण हा दिवसभरातील कडक उन्हाचा काळ असतो.

३.तसेच आउटडोअर वर्कआउटसाठी घराबाहेर पडताना आरामदायक सुती अथवा सुती-पॉलिस्टर मिक्स असलेले कपडे घाला.तसेच ते कपडे शरीर थंड ठेवण्यासाठी हलक्या रंगाचे व घाम सहजरित्या शोषून घेणारे असावेत.लायक्रा सारख्या कापडाचे गडद रंगाचे घट्ट कपडे सुर्यप्रकाश जास्त प्रमाणात शोषून घेतात.त्यामुळे ते एअरकंडीशर असलेल्या जीममध्येच जास्त सोयीस्कर असतात.मात्र बाहेरील वातावरणात अशा कपडयांमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.असे आरामदायक नसल्याने घामामुळे शरीरावर घामोळे व रॅशेस येण्याची देखील शक्यता असते.त्याचप्रमाणे बाहेर जाताना कॅप अथवा हॅट घालण्याचा देखील सल्ला देण्यात येतो.

४.उष्णतेमुळे अधिक घाम येतो.घामामुळे शरीराला थंडावा मिळतो व शरीराचे तापमान खाली जाते.पण घामामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता कारण घामाद्वारे तुमच्या शरीरातील पाणी,इलेक्ट्रॉलाइट व मीठ कमी होते.त्यामुळे इलेक्ट्रॉलेट पाणी पिऊन तुम्ही तुमचे शरीर पुन्हा री-हायड्रेट करणे फार गरजेचे असते.ज्यामुळे वर्कआउट नंतर देखील तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते.तसेच उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग पेय – जलजीरा देखील जरुर करुन बघा.

५.जर तुम्हाला उष्णतेमुळे आजारपण येण्याची लक्षणे दिसत असतील तर अशा वेळी तुम्ही व्यायाम कमी करावा अथवा व्यायाम करणे थांबवावे.कधीच जास्त थकवा येईल अशा पद्धतीने व्यायाम करु नका.

६.जर तुम्ही घराबाहेर काम करीत असाल तर अचानक उन्हामध्ये जाऊ नका.एअर कंडीशनर रुममधून अथवा थंड जागेतून लगेच बाहेरील सुर्यप्रकाशात जाणे टाळा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ’4′फायद्यांसाठी मुलांना व्हिडियो गेम खेळू द्या !

$
0
0

तुम्हाला लहानपणी रविवारी सुट्टीच्या दिवशी मस्त घराबाहेर फिरायला जाणे किंवा मैदानी खेळ खेळणे खूप आवडायचे.पण आता तुमची मुले मात्र  असे करण्यापेक्षा घरात सतत व्हिडीओ गेमला चिकटलेली असतात.व्हिडीओ गेम खेळताना त्यांना अगदी जगाचे भान देखील राहत नाही.सहाजिकच यामुळे तुमची सतत चीडचीड होत असते.अनेक पालकांची हीच तक्रार असते की मैदानी खेळ खेळण्यापेक्षा त्यांचा मुलांना घरात बसून व्हिडीओ गेम खेळत बसणे फार आवडते. 

पण याबाबत आता फार चिंता करण्याची काहीच गरज नाही.कारण आता शास्त्रीयदृष्या व्हिडीओ गेम खेळणे हे तितकेसे अयोग्य नसल्याचे सिद्ध झाले आहे.इतकेच नाही तर व्हिडीओ गेम खेळणे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी चांगले असते.कारण व्हिडीओ गेम खेळल्यामुळे तुमच्या मुलांचा मानसिक विकास होऊ शकतो.त्याचसोबत या ‘५’ कारणांसाठी मुलांना अवश्य घराबाहेर पडून खेळू द्या !हे देखील जरुर वाचा.

यासाठी मुलांना व्हिडीओ गेम खेळू देण्याची ही ४ शास्त्रीय कारणे जरुर वाचा-

व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांचे विचार कौशल्य समृद्ध होते-

  • व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांना कोणताही बौद्धिक फायदा होत नाही हा समज चुकीचा आहे.उलट व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांचा भावनिक विकास होतो.यामुळे त्यांच्यामध्ये विचार करणे,वाचन करणे,एखादी गोष्ट समजून घेणे,चर्चा करणे व एकाग्रता ही कौशल्ये सुधारण्यास मदत होते.विशेषत: हिरो ४ व ग्रॅन्ड थेफ्ट ऑटो आयव्ही या गेममध्ये अॅक्शन समाविष्ट असल्यामुळे हे खरे आहे.त्याचसोबत मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ५ टीप्स देखील जरुर वाचा.

  • जी मुले मेंटल रोटेशन(रोटेड केल्यावर थ्रीडी अथवा टूडी इमेज कशी दिसू शकेल याची कल्पना करणे) सारखे गेम खेळतात त्यांच्यामध्ये एकाग्रता व काल्पनिक विचार करण्याची क्षमता असते.

  • काही संशोधनानूसार हायस्कूल व कॉलेज पेक्षा व्हिडीओ गेम द्वारे थिंकींग स्कील्स जास्त चांगल्या प्रकारे शिकवले जातात.अनेक अॅक्शन ओरीएंटेड व्हिडीओ गेम्स मध्ये काही सेकंदाच्या आत निर्णय घेण्याची गरज असते त्यामुळे त्या मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.इतकेच नाही तर यामुळे त्या मुलांमध्ये क्रिएटीव्हीटी व समस्या सोडवण्याचे कौशल्य देखील विकसित होते.

मुले अपयश पचविण्यासाठी तयार होतात-

  • याला इन्क्रीमेंटल थेअरी ऑफ इंटीलेंजट असे म्हणतात.जी मुले प्रयत्न करतात त्यांची आपण( असे वा! तू खूप छान खेळलास )अशी स्तुती करतो तेव्हा त्यांच्यामध्ये असा विश्वास निर्माण होतो की ते जीवनात पुढे स्मार्ट होतील.पण मुलांचे आपण जेव्हा त्यांच्या स्मार्टनेस साठी कौतूक करतो ( असे वा! तू खूप स्मार्ट आहेस) तेव्हा त्या मुलांमध्ये आपण जन्मताच स्मार्ट असून स्मार्टनेस ही उपजत देणगी असून ती मिळवण्याची गोष्ट नाही ही भावना निर्माण होते.

  • संशोधकांना असा विश्वास आहे की व्हिडीओ गेम खेळणे मुलांच्या बुद्धीमत्ता विकासासाठी चांगले असते.कारण अनेक वेळा अपयश येऊन देखील प्रत्येक वेळी तुमचे मुल अधिक चांगल्या प्रकारे गेम खेळण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे त्याला चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.

  • व्हिडीओ गेम मध्ये पॉइंट्स व स्कोर असतात त्यामुळे मुलांमध्ये ख-या आयुष्यात प्रतिक्रिया घेण्याचे कौशल्य विकसित होते.त्यामुळे अपयशाला सामोरे जाणे व आत्मविश्वास वाढवणे त्याला सोपे जाते.

  • शास्त्रज्ञांच्या मते अशी मुले त्यांच्या ध्येयाविषयी सकारात्मक होतात.त्यामुळे याचा त्यांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी देखील चांगला फायदा होतो.तसेच या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा.

व्हिडीओ गेम मुळे मुले भावनिक दृष्ट्या मजबूत होतात-

  • सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी मले व तरुणांनी गेम खेळणे हा एक उत्तम व प्रभावी मार्ग असतो.काही संशोधनामधून असे सिद्ध झाले आहे की आवडीचा व्हिडीओ गेम खेळणे व मूड सुधारणे याचा घनिष्ट सबंध असतो.हे आपल्याला विशेषत: अॅन्ग्री बर्ड सारख्या पझल गेम मध्ये प्रामुख्याने जाणवते.

  • गेम जिंकल्यावर मुलांमध्ये स्वाभिमानाची ही भावना जागृत होते.गेम खेळल्यामुळे मुलांना एकलकोंडेपणा व उदासिनतेमधून बाहेर येण्यास देखील मदत होते.

  • काही संशोधनात असे आढळले आहे की वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट सारख्या गेम मधील भुमिका व अवतार यामुळे ते खेळणा-यांना नैराश्य व चिंतेला चांगल्याप्रकारे हाताळता येते.तसेच मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा

व्हिडीओ गेम मुळे मुले अधिक सोशल होतात-

  • आजकाल व्हिडीओ गेम हे अनेक लोकांनी एकत्र खेळण्यासारखे असतात ते एकटे खेळता येत नाहीत. वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट सारख्या गेमचे दहा दशलक्ष खेळाडू असू शकतात.त्यामुळे विविध गेम खेळण्यासाठी खेळाडूंना इतर खेळाडूंची देखील आवश्यक्ता असते.संशोधकाच्या मते यामुळे वर्च्युअल कम्युनिटीज निर्माण होतात.तसेच यामुळे मुलांमध्ये कोणावर विश्वास ठेवावा व ग्रूपचे नेतृत्व कसे करावे हे गुण विकसित होतात.
  • या सर्व स्थितीतून मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात.ज्याची त्यांना त्यांच्या ख-या आयुष्यात घरातील मंडळी व मित्रमैत्रिणींमध्ये मिसळण्यामध्ये मदत होते.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

विभूती अथवा भस्म लावण्याचे महत्व !

$
0
0

भस्म अथवा विभूती म्हणजे पवित्र राख.जी मंत्रजपासह एखाद्या धुनी,होम अथवा यज्ञातील विशिष्ट लाकूड,तुप,औषधी वनस्पती व काही पवित्र गोष्टीपासून तयार झालेली असते.आपल्या संस्कृतीमध्ये हे पवित्र भस्म कपाळावर लावणे महत्वाचे मानले जाते.भारतात अशी विभूती अथवा भस्म अंगाला लावणे हे सामान्यपणे दिसून येते.एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास त्या परिसरातील अध्यात्मिक मंडळींनी अंगाला विभूती अथवा भस्म लावलेले आपल्याला दिसते.भस्म अंगाला लावण्याबाबत असा समज आहे की विभूती अथवा भस्म अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट व दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते.तुम्हाला कदाचित चंदन कपाळाला लावण्याचे धार्मिक महत्व माहित असेलच.पण चंदनाप्रमाणे भस्म अथवा पवित्र राख देखील कपाळाला लावण्याचे विशिष्ट असे फायदे आहेत.यासाठी आयुर्वेदिक तज्ञ Dr. Nitasha Manikantan यांच्याकडून जाणून घेऊयात अंगाला भस्म लावल्याचे नेमके काय महत्व असते.यासोबत नियमित मंत्रोच्चाराचे आरोग्यदायी फायदे !देखील जरुर वाचा.

विभूती अथवा भस्म लावण्याचे फायदे-

डोकेदुखी कमी होते-

चायनिज अॅक्युप्रेशर शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील दोन भुवयांच्या मधील भाग हा शरीरातील सर्व नसांना जोडणारा बिंदू आहे असे मानन्यात येते.त्यामुळे त्या भागावर मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते असा देखील समज आहे.दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊ शकते.तसेच यासाठी अधिक वाचा अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय !

तुम्ही सकारात्मक होता-

तिसरा डोळा हा तुमच्या अंर्तमनाचे प्रतिनिधीत्व करीत असून तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्यरत असतो. तुमच्या शरीरातील या चक्रामध्ये नकारात्मक विचारांमधून नकारात्मक उर्जा शरीरात प्रवेश करत असते.मात्र पवित्र भस्म अथवा विभूती तिथे लावल्यामुळे नकारात्मक उर्जेला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखता येऊ शकते.

सर्दी पासून संरक्षण होते-

भस्म अथवा राखेचा आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापर करण्यात येतो.भस्म अथवा विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आद्रता शोषून घेतली जाते व सर्दीपासून देखील संरक्षण होते.

शरीरातील उर्जेची कवाडे मोकळी होतात-

जर तुमच्या शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवाहित होण्यामध्ये अडथळे येत असतील तर भस्म अथवा पवित्र राख लावल्याने शरीरात उर्जेचा स्त्रोत प्रवेश करणारी दारे उघडी होतात व तुम्हाला नैसर्गिक उर्जेचा पुरवठा होतो.तसेच उत्तम आरोग्यासाठी भस्म लाऊन शरीरातील सप्तचक्र देखील कार्यरत केली जातात.

भस्म अथवा राख सामान्यत: कपाळावर लावण्यात येते.पण एखादी व्यक्ती भस्म अथवा पवित्र राख छाती अथवा दंडावर देखील लावू शकते.यासाठीच काही लोक पुर्ण सर्वांगाला भस्म लावतात.तसेच यासोबत वाचा अभ्यंगस्नान- तेलाच्या मसाजामध्ये दडलय निरोगी स्वास्थ्याचे रहस्य !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Facebook/Duvvada-Jagannadham


घोरणे ही समस्यादेखील देते या ’6′आजारांचे संकेत !

$
0
0

घोरणे म्हणजे झोपेमध्ये श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारा एक कंपनयुक्त आवाज.घोरण्यासाठी नाकपुडीच्या आतील भागातील टीश्यू,टाळू,जीभ,पडजीभ आणि टॉन्सिल्स या गोष्टी कारणीभूत असतात.जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा नाक अथवा तोंडावाटे हवा आत घेतली जाते व पुढे ती घशाच्या आतून फुफ्फुसांपर्यंत पोहचते.त्यानंतर जेव्हा तुम्ही उश्वास बाहेर टाकता तेव्हा फुफ्फुसांमधून हवा पुन्हा घशामध्ये येते व नाक अथवा तोंडाद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.ज्या माणसांना रात्री झोपेत घोरण्याची समस्या असते त्यांचा श्वसनमार्ग अरुंद झालेला असतो.कारण त्यांच्या श्वसनमार्गातील स्नायू शिथिल होतात त्यामुळे हवा आतबाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो व श्वसनक्रिया थांबते.श्वसनक्रिया थांबण्याचा कालावधी साधारपणे काही सेकंद ते काही मिनीटांचा असू शकतो.

या कालवधीमध्ये मेंदू जागृत होतो व श्वसन पुन्हा सुरु होते.पण या काळानंतर देखील श्वसनमार्ग अरुंदच राहतो.त्यामुळे श्वसनमार्गातील टीश्यूमध्ये कंपने निर्माण होतात ज्यामुळे घोरण्याच्या आवाजाची निर्मिती होते.श्वसनक्रिया काही सेंकदापेक्षा अधिक काळ थांबणे हे धोकादायक असू शकते कारण त्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडची पातळी वाढते.या स्थितीला हायपोक्सिया असे म्हणतात.घोरण्याचा तुमच्या प्रमाणेच तुमच्या न घोरण्या-या जोडीदाराच्या आयुष्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.ब-याचदा घोरणे हे एखाद्या आजारबाबत धोक्याची सूचना देणारे एक लक्षण असू शकते.यासाठी घोरण्याच्या समस्येतून मिळवा ‘विनाशस्त्रक्रिया’ सुटका !

Obstructive sleep apnoea (OSA)-

ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्निया या झोपेच्या विकारामध्ये घोरणे हे लक्षण प्रामुख्याने आढळते.या विकारामुळे दिवसा प्रंचड झोप येते.ज्यामुळे दिवसा गाडी चालवताना भयंकर अपघात होण्याची अथवा कामात चुका होण्याची शक्यता असते.तसेच या विकारामुळे ह्रदयविकार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.झोपेमध्ये वारंवार श्वसनमार्गात अडथळा आल्यामुळे स्लीप अॅप्निया हा विकार निर्माण होतो.हा अडथळा कधीकधी तात्पुरता अथवा कधीकधी कायम असू शकतो.शास्त्रज्ञांच्या मते स्टेडी घोरणे नियंत्रणात आणता येते पण नियमित घोरण्याचा धोका तेव्हाच कमी असू शकतो जेव्हा तुमचे घोरण्याचे प्रमाण १५ टक्कांपेक्षा कमी असेल.तुम्ही घरीच तुमच्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ही घोरण्याची टक्केवारी काढू शकता.तसेच रात्री झोप येत नाही? मग हे १० उपाय करून पहा !

Metabolic Syndrome-

घोरणे हे नेहमीच ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्नियामुळे असू शकते असे नाही.कारण घोरणे हे मेटाबॉलिक सिन्ड्रोम या गंभीर आरोग्य समस्येचे देखील लक्षण असू शकते.जसे की रक्तदाब वाढणे,हाय ब्लड शूगर, कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य असणे,पोटावर अति चरबी असणे या समस्यांमुळे देखील तुम्हाला मधुमेह,स्ट्रोक व ह्रदयविकार होण्याचा धोका असतो.

खालील पैकी तीन अथवा अधिक लक्षणे असल्यास तुम्हाला मेटाबॉलिक सिन्ड्रोम असू शकतो.

  • triglycerides ≥१५० mg/dl (१.७ mmol/liter)

  • हाय-डेस्टिनी लिपोप्रोटीन high-density lipoprotein (HDL) कोलेस्टेरॉल < ४० mg/dl (१.० mmol/l) पुरुषांसाठी व < ५० mg/dl (१.३ mmol/l) स्त्रीयांसाठी

  • रक्तदाब ≥१३०/८५ mm Hg

  • फास्टींग ग्लूकोज ≥१०० mg/dl

  • कंबरेचा घेर ≥९० cm (पुरुष) अथवा ≥८० cm (महिला)

संशोधकांना घोरण्याचा संबध हा मेटाबॉलिक सिन्ड्रोमसोबत विशेषत: मधुमेहाच्या धोक्यासह अधिक असल्याचे आढळले आहे.

उदा.चेन्नईमधील एका संशोधनात ६५ टक्के घोरणा-या लोकांमध्ये IDRS scores (मधुमेहाचा धोका मोजमाप) साठ पेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे तर न घोरण्या-या लोकांमध्ये हे प्रमाण ४६ टक्के आढळले.न घोरणा-या लोकांपेक्षा घोरणा-या लोकांमध्ये अगदी पोटाकडील भागावर लठ्ठपणा नसला तरी देखील मेटाबॉलिक सिन्ड्रोम होण्याची शक्यता अधिक असते.

त्याचप्रमाणे आणखी एका संशोधनामध्ये असे आढळले आहे की ३० ते ६९ वयातील घोरणा-या पुरुषांमध्ये दहा वर्षात मधुमेह होण्याची शक्यता वाढू शकते.संशोधकाच्या मते लठ्ठपणा हा मधुमेहाचा धोका विकसित करणारा महत्वाचा घटक आहे.जर तुम्हाला घोरण्याची सवय असेल तर यात अधिकच भर पडते.

मधूमेह-

मधूमेह व घोरण्याचा फार जवळचा संबध असतो.शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की महिलांमध्ये मधुमेहासह घोरणे जास्त प्रमाणात असते.त्याचप्रमाणे प्री-मॅनोपॉजच्या काळातील महिलांमध्ये यासह पीसीओएस(पॉलिस्टीक ओव्हरी सिन्ड्रोम)ची समस्या देखील आढळते.असे असले तरी घोरण्याचा मधुमेहाशी नेमका कसा संबध असू शकतो याचे कारण संशोधकांना अद्याप खात्रीदायक रित्या सापडलेले नाही.त्यांच्यामते हायपोक्सियामुळे(ऑक्सिजनची पातळी खालावते)श्वसनक्रिया काही सेकंदासाठी थांबल्यामुळे ऑक्सिडेटीव्ह तणाव निर्माण होतो ज्यामुळे इन्सुलीनला प्रतिकार निर्माण होतो.यासाठी मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय जरुर करा.

Dyslipidemia,ह्रदयविकार,उच्च रक्तदाब-

Dyslipidemia हा विकार प्रामुख्याने हाय कोलेस्टेरॉलची पातळी दर्शवतो.याबाबत योग्य उपचार त्वरीत न केल्यास Atherosclerosis(रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे) cirrhosis (बरा न होण्यासारखा यकृत विकार) तसेच कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसिज निर्माण होतात.अनेक संशोधनात असे आढळले आहे की घोरण्याचा व Dyslipidemia या विकाराचा घनिष्ट संबध असतो.तसेच बीएमआय २५ पेक्षा अधिक,मधुमेह व उच्चरक्तदाब या समस्यांची देखील घोरण्यासह Dyslipidemia विकार असण्यामागे महत्वाची भुमिका असते.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉर्गं इन्टेन्सिव्ह स्नोरींग पेक्षा लो इन्टेन्सिव्ह स्नोरींग चा Dyslipidemia विकाराशी अधिक संबध असतो.ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस मुळे ऑब्स्ट्रक्टीव्ह स्लीप अॅप्निया,मेटाबॉलिक सिन्ड्रोम अथवा इन्फ्लैमशन या समस्या निर्माण होतात.

त्याचप्रमाणे रक्तदाब वाढणे व घोरणे यांचा देखील याचाशी संबध असतो.हायपरटेंशच्या प्रभावामुळे घोरण्याच्या प्रमाणात देखील वाढ होते.घोरणे,वय,बीएमआय,मद्यपानाचे प्रमाण हे हायपरटेंशनचा धोका वाढवणारे घटक असतात.हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात हे देखील जरुर वाचा.

Carotid artery atherosclerosis-

वर उल्लेख केलेल्या विकारांचा एक किंवा अनेक माध्यमातून घोरण्याशी संबध येत असतो.पण Carotid artery atherosclerosis ही अशी आरोग्य समस्या आहे जी घोरण्यामुळे होते. Carotid arteries या डोके व चेहरा यांना रक्तातून ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या रक्तवाहिन्या असतात.जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये फॅट,कोलेस्टेरॉल,कॅलशियम आणि इतर घटकांमुळे अडथळा निर्माण होतो तेव्हा त्या टणक होतात.ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा रक्तपुरवठा करण्यास त्यांना मर्यादा येतात.कोणत्याही रक्तवाहिनीमध्ये अडथळा आल्यास त्यामुळे हार्टअटॅक व स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.आता तर Laryngoscope या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानूसार Carotid arteries व Pharyngeal wall हे एकमेकांच्या अगदी जवळ अाहेत असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे जोरात घोरण्याच्या आवाजामुळे Carotid arteries मध्ये कंपने निर्माण होऊ शकतात.ज्यामुळे Carotid arteries च्या आतील थराची जाडी बदलून जखम अथवा दाह झाल्यामुळे Atherosclerosis ही समस्या होऊ शकते.

या रक्तवाहिनीचा आतील भाग हा इन्‍डोथिलील पेशींच्या अस्तराचा असतो.ज्या पेशींमुळे रक्त व टीश्यू मध्ये द्रव,पोषकमुल्ये,गॅसेस व टाकाऊ पदार्थ झिरपणे यावर नियंत्रित करता येते.त्याचप्रमाणे या इन्‍डोथिलील पेशींमुळे कोणताही अडथळा नसल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.पण जेव्हा या भागात अडथळा निर्माण होतो तेव्हा इन्‍डोथिलील पेशी दाह नियंत्रणात आणण्यासाठी cytokine निर्माण करतात.तसेच या पेशींचा आकार देखील ही कंपने निर्माण झाल्यामुळे बदलतो.रासायनिक प्रक्रिया सतत झाल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर लिपिड जमा होते ज्याला Intima असे म्हणतात.ज्यामुळेAtherosclerosis ही समस्या होऊ शकते.

Henry Ford च्या Otolaryngology-Head & Neck Surgery विभागाचे डॉ.रॉबर्ट डीब यांच्या मते झोपताना घोरण्याची समस्या ही त्रासदायक असल्याने तिच्याकडे दुर्लक्ष करु नका.तसेच या सोबत इतर वैद्यकीय समस्या असल्यास त्यावर लगेच योग्य उपचार करा.तसेच जाणून घ्या लहान मुलांमधील घोरण्याच्या समस्येमागे दडलीत ही ’8′ कारणं

संदर्भ-

  1. Alakuijala A, Salmi T. Predicting Obstructive Sleep Apnea with Periodic Snoring Sound Recorded at Home. Journal of Clinical Sleep Medicine: JCSM: Official Publication of the American Academy of Sleep Medicine. 2016;12(7):953-958. doi:10.5664/jcsm.5922.

  1. Roopa M, Deepa M, Indulekha K, Mohan V. Prevalence of Sleep Abnormalities and Their Association with Metabolic Syndrome among Asian Indians: Chennai Urban Rural Epidemiology Study (CURES – 67). Journal of Diabetes Science and Technology. 2010;4(6):1524-1531.

  1. Elmasry, A., Janson, C., Lindberg, E., Gislason, T., Tageldin, M. A. and Boman, G.  The role of habitual snoring and obesity in the development of diabetes: a 10-year follow-up study in a male population. Journal of Internal Medicine. 2000. 248: 13–20. doi:10.1046/j.1365-2796.2000.00683.x.

  1. Xiong X, Zhong A, Xu H, Wang C. Association between Self-Reported Habitual Snoring and Diabetes Mellitus: A Systemic Review and Meta-Analysis. Journal of Diabetes Research. 2016;2016:1958981. doi:10.1155/2016/1958981.

  1. Zhang N, Chen Y, Chen S, et al. Self-Reported Snoring Is Associated with Dyslipidemia, High Total Cholesterol, and High Low-Density Lipoprotein Cholesterol in Obesity: A Cross-Sectional Study from a Rural Area of China. Clifton P, ed. International Journal of Environmental Research and Public Health. 2017;14(1):86. doi:10.3390/ijerph14010086.

  1. Liu Jianhong, Liang Dahua, Wei Cai Zhou, et al. Analysis of blood pressure in snoring population in Guangxi [J]. Chinese Journal of Tuberculosis and Respiratory Diseases. 2007,30 (5): 347-351.

  1. Nordqvist, Christian. Snoring Can Affect The Carotid Artery. Medical News Today. MediLexicon, Intl., 27 Jan. 2013. Web.

  2. Deeb, R., Judge, P., Peterson, E., Lin, J. C. and Yaremchuk, K. Snoring and carotid artery intima-media thickness. The Laryngoscope. 2014; 124: 1486–1491. doi: 10.1002/lary.24527.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

व्यायाम आणि जीम बाबत हे ’9′समज -गैरसमज दूर कराच !

$
0
0

फीटनेस एक्सपर्ट म्हणजे तुमचा वर्कआऊट व व्यायामाचा सराव करुन घेणारी एक प्रशिक्षित व्यक्ती.व्यायाम हा नेहमी प्रशिक्षित तज्ञांच्या देखरेखी खालीच करणे गरजेचे असते.मात्र व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याबाबत तुम्हाला पुरेसे ज्ञान असणे देखील तितकेच आवश्यक आहे.यासाठी कोलकत्ता बेस फीटनेस एक्सपर्ट अर्नव सरकार यांच्याकडून जाणून घेऊयात अशा काही महत्वाच्या गोष्टी ज्या व्यायामापूर्वी तुम्हाला माहित असणे फार गरजेचे आहे.तसेच जरुर वाचा gym exercise करताना केलेल्या या ५ चुकांमुळे वाढतात केसांच्या व त्वचेच्या समस्या

१.आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एक तास व्यायाम करण्याची गरज नाही-

व्यायामाचा कालावधी हा निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असतो.ब-याचदा यासाठी हेल्थ,फॅट लॉस,स्ट्रेन्थ गेन अशी काही गोल्स ठरविण्यात येतात.यासाठी ३० ते ४५ मिनीटे इतका कालावधी पुरेसा असू शकतो.प्रोफेशनल अॅथलीट्स साठी मात्र दिवसभरात एक तासांपेक्षा अधिक काळ व्यायामाचा सराव करण्याची गरज असू शकते.आठवड्यातून २ ते ५ दिवस इन्टेन्स एक्सरसाईज व इतर दिवस लायटर इन्टेन्सिटी ट्रेनिंग करणे योग्य आहे.थोडक्यात आठवडाभर जास्तीत जास्त दिवस सक्रीय असणे हे अधिक महत्वाचे आहे.

२.अधिक घाम आल्यास जास्त फॅट बर्न होते हा एक गैरसमज आहे-

शरीरातून जास्त घाम आला तर अधिक फॅट बर्न होतात असे मुळीच नाही.जास्त घाम आल्याने फॅट नाही तर शरीरातून अधिक पाणी कमी होते.पुरेसे पाणी पिऊन अथवा स्वत:ला हायड्रेट करुन तुम्ही पाण्याची कमतरता भरुन काढू शकता.तसेच जाणून घ्या टीनएजर्सनी जीममध्ये घाम गाळणे योग्य आहे का ?

३.वेट लिफ्टींग करुन शरीरसौष्ठव करता येत नाही-

शरीरसौष्ठव हे व्यायाम व डाएटने कमावता येते.फक्त वेट लिफ्टींग करुन शरीर कमावता येत नाही.बरेच अॅथलीट जसे की रनींग,क्रिकेट अशा स्पोर्ट्स मध्ये सहभाग घेणारे स्पोर्टस पर्सन वेट लिफ्टींग करतात तरी देखील त्यांचे शरीर प्रोफेशनल बॉडीबिल्डर सारखे मुळीच नसते.कारण शरीरसौष्टव प्राप्त करण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक नियोजित डाएट घेणे गरजेचे असते.यासाठी जाणून घ्या ‘सुल्तान’ सलमान खानसारखी बॉडी बनवण्याचे खास फीटनेस फंडे !

४. Kettlebells हा dumbbells पेक्षा निराळा व्यायाम असतो व त्यामुळे तुमच्या पाठीला त्रास होत नाही-

हे दोन्हीही रेसिस्टन्स ट्रेनिंगचेच प्रकार आहे तसेच ते योग्य प्रकारे केल्यास त्यांचे फायदे देखील चांगले होतात.मात्र त्या दोघांच्या डिझाइन व बॉडी अलाइन्सच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे.या दोन्हीही व्यायामाच्या सरावामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो.

५.कार्डीओ व्यायाम सर्वासांठी गरजेचे नसतात-

कार्डिओ व्यायामाचे निरनिराळे प्रकार आहेत.ते फक्त मॉर्निंग वॉक व जॉगींग पुरतेच ते मर्यादीत नक्कीच नाहीत.एका लहान विश्रांतीनंतर केलेल्या वेट ट्रेनिंग मुळे देखील कार्डीओ वॅस्क्युलर फायदे होतात.त्यामुळे एखादा ट्रेडीशनल कार्डीओ न करता देखील कार्डीओ वर्कआउट करता येऊ शकतो.यासाठी चांगल्या परिणांमांसाठी ट्रेडीशनल कार्डीओच्या काही प्रकारांचा सराव आठवड्यातून १ ते ३ वेळा करा असे सांगितले जाते.तसेच जिमवरून आल्यानंतर या ५ चुका टाळाच !

६.फॅट कमी करण्यासाठी शरीराला फॅट देणे गरजेचे असते-

फॅट हे निरोगी व सतुंलित आहारासाठी खूप महत्वाचे असते.शरीराला पुरेश्या प्रमाणात फॅट न मिळाल्यास हॉर्मोन्सची निर्मिती योग्य होत नाही.ज्याच्या परिणामामुळे शरीरातील चरबी हळूहळू कमी होते व शरीरातील पाणी व स्नायूंचे देखील नुकसान होते.हे देखील जरुर वाचा जीम प्रोटीन्स घेणं योग्य की अयोग्य ?

७.स्ट्रेचनींगमुळे स्नायूंमधील वेदना कमी होत नाहीत-

ट्रेनिंग सेशन नंतर ब-याचदा स्नायूंमध्ये वेदना होतात.या वेदना स्ट्रेचनींगमुळे कमी होत नाहीत.या वेदना कमी करण्यासाठी चांगला आराम व योग्य पोषणाची गरज असते.

८.महिलांसाठी देखील शरीरसौष्ठव करणे हेल्थी असू शकते-

शरीर कमवणे हे पुरुष अथवा महिलेच्या स्वेच्छेवर अवलंबून आहे.जर एखाद्या स्त्रीचे वजन कमी असेल व तिला यासाठी शरीर कमवायचे असेल तर ते तिच्या साठी नक्कीच चांगले असू शकते.पण एखाद्या आदर्श अथवा अतिवजन असलेल्या व्यक्तीने व्यायामाद्वारे शरीर वाढवल्यास त्याला नक्कीच आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.यासाठी ‘वजनदार’ साठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापटने कशी घेतली मेहनत हे देखील जरुर वाचा.

९.पन्नासीच्या पुढील लोक व्यायाम करु शकत नाहीत-

निरोगी स्वास्थासाठी प्रत्येक व्यक्तीने व्यायाम करणे आवश्यक आहे.निरोगी राहण्यासाठी व आयुष्याचा आनंद घेण्यासाठी व्यायामाचा नेहमीच चांगला फायदा होतो.पण जर एखाद्या व्यक्तीने ५० वर्षांनंतर व्यायामाला सुरुवात केली असेल तर तिने यासाठी सरावास हळूहळू सुरुवात करायला हवी व तसेच काही मर्यादा देखील पाळणे गरजेचे आहे.यासाठी वाचा ‘झुंबा’- वयाच, व्याधींच बंधन झुगारून फीटनेस राखण्याचा मजेशीर प्रकार !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

ब्लेन्डेड ऑर्गेझमचा आनंद घेण्यासाठी खास ४ सेक्स पोझिशन

$
0
0

जर तुमच्या स्त्री जोडीदारास तुम्ही अभुतपूर्व ऑर्गेझमचा आनंद देऊ इच्छीत असाल तर यासाठी तुम्ही ब्लेन्डेड ऑर्गेझम जरुर ट्राय करा.यामुळे तिला वजानल व क्लीटोरल हे दोन्ही ऑर्गेझम एकत्र अनुभवता येतात.अनेक महिलांना ब्लेन्डेड आर्गेझम फार आवडतो.तुम्हाला यात मास्टर होण्यासाठी थोडा सराव करण्याची गरज असते पण एकदा का तुम्हाला ते जमू लागले तर तुमची स्त्री जोडीदार वारंवार तुमच्याकडे याची मागणी करु शकते.जर तुम्ही बेसिक वेनिला पोझिशन मध्ये मास्टर असाल तर आता तुम्हाला या ब्लेन्डेड ऑर्गेझमच्या ४ पोझिशनकडे वळण्याची गरज आहे.तसेच हे जरुर वाचा फोरप्ले मुळे स्त्रिया सेक्ससाठी प्रवृत्त होतात का?

एल पोझिशन-या पोझिशनमध्ये तुमची स्त्री जोडीदार बेडच्या कडेला पाठीवर झोपते.या स्थितीत तिचे नितंब बेडच्या कडेला असावेत.ब्लेन्डेड ऑर्गेझमसाठी जी-स्पॉट गाठण्याची गरज असते यासाठी तिच्या नितंबाखाली उशी ठेवा.ज्यामुळे ते वर उचलले जातील व तुम्हाला जी-स्पॉट गाठणे सोपे जाईल.यावेळी तुमची स्थिती तिच्या समोर अशी असावी ज्यामुळे तुमच्या दोघांची पोझिशन एल आकाराची होईल.तुम्ही या स्थितीत तिच्या योनीभागाला स्पर्श करु शकता अथवा तुमचा वेग वाढवून तिला ऑर्गेझम देऊ शकता.सेक्सचा अधिक वेळ आनंद घेण्यासाठी ’10′ हॉट टीप्स !नक्की वाचा

रिव्हर्स काउगर्ल-जर स्त्री पुरुषाच्या अंगावर असेल तर त्याला तिच्या योनीमार्गाजवळ पोहचणे सोपे जाते.यासाठी रिव्हर्स काउगर्ल ट्राय करा ज्यामुळे तुम्हाला जी-स्पॉट गाठणे सोपे जाईल.या स्थितीत स्त्री पुरुषावर असते व तिचा चेहरा पुरुषाच्या विरुद्ध दिशेला असतो.तिच्या योनीमार्गाला स्पर्श केल्यावर वळलेल्या पोझिशन मध्ये पेनिट्रेशन करा.योग्य स्थितीत आल्यावर तिच्या योनीमार्गावर त्याच वेगात स्पर्श करा व तिला ऑर्गेझमचा आनंद घेताना पहा.

स्पुनिंग-ज्या स्थितीत तुम्ही तिच्या योनीमार्गाजवळ असता ती कोणतीही पोझिशन तिला ब्लेन्डेड ऑर्गेझम देण्यास योग्य असते.पण त्याच बरोबर जी-स्पॉट गाठणे हे देखील तितकेच महत्वाचे असते हे लक्षात ठेवा.जर स्पुनिंग तुमची आवडती सेक्स पोझिशन असेल तर दोघांनी कुशीवर झोपा व हळूवार सुरुवात करा.जेव्हा ती क्लायमेक्सच्या जवळ जातेय असे तुम्हाला वाटू लागेल तेव्हा ब्लेन्डेड ऑर्गेझमकडे वळा.जरुर वाचा तुमच्या लव्ह लाईफबद्दल संकेत देतात या ’6′ झोपण्याच्या स्थिती !

डॉगी स्टाइल-जर तुमच्या स्त्री जोडीदाराला तुम्ही पेनिट्रेट करताना आनंद मिळत असेल तर डॉगी स्टाइल तुमच्यासाठी उत्तम असू शकते.यासाठी उभे राहून अथवा बेड किंवा खुर्चीवर कडेला वाकून अशा तुमच्या कोणत्याही आवडत्या डॉगी स्टाइल मध्ये जा. तिचा योनीभागाजवळ गेल्यावर तिला स्पर्श करा.डॉगी स्टाइल मध्ये सेक्स करणे वाइल्ड अनुभव देणारे असू शकते.तसेच यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !!देखील जरुर वाचा.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

या ९ कारणांसाठी बेस्टफ्रेन्डला तुमचा लाईफ़ पार्टनर बनवा !

$
0
0

बेस्ट फ्रेन्ड ही तुमच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती असते जिच्यासोबत तुम्ही हक्काने हसता,रडता,भांडता.जिवलग मित्र अथवा मैत्रिणीसोबत तासनतास गप्पा मारताना देखील तुम्ही मुळीच थकत नाही.एकवेळ जर तुमचा बॉयफ्रेन्ड अथवा गर्लफ्रेन्ड तुमच्यापासून दूर गेले तर तुम्हाला चालते पण बेस्ट फ्रेन्ड ला गमावणे तुम्हाला अजिबात शक्य नसते.त्यामुळे तुमच्या बेस्ट फ्रेन्ड सोबत लव रिलेशनशिप करणे तुमच्यासाठी कसे चांगले असू शकते हे नक्की जाणून घ्या.

तुमच्या बेस्ट फ्रेन्डलाच तुमचा लाईफ पार्टनर करण्याची ही ९ कारणे जरुर वाचा-

  • तुम्हाला एकमेकांच्या मनात काय चालले आहे हे अगदी चांगले समजू शकते.कारण तुम्हाला एकमेकांना काहीही सांगण्याची गरज लागत नाही.तुम्हाला एकमेकांची विचार करण्याची पद्धत माहित असते व चर्चा करताना एखाद्या प्रश्नाचे उत्तर काय असेल हे देखील तुम्हाला तुमच्या बेस्टीने न सांगताच समजते.

  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा दोघांचे अनेक मित्र-मैत्रिणी कॉमन असतात.त्यामुळे लाईफ पार्टनर अथवा जोडीदाराला नंतर तुमचे मित्र-मैत्रिणी न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.जर तुम्ही एकाच ग्रुपमधले असाल तर तुम्हाला नंतर तुमच्या मित्र-मैत्रिणींपासून दूर रहावे लागत नाही.हे जरुर वाचा मुलींनी पुढाकार घेऊन प्रपोज केल्यास होतील हे ’9′ फायदे !

  • तुमच्या जोडीदाराला देखील तुमचे मित्र-मैत्रिणी आवडत असतात.त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्याची परवानगी वगैरे घेण्याची समस्या निर्माण होत नाही.

  • तुम्ही बराच काळ एकत्र घालवला असल्याने तुम्हाला एकमेकांचे वागणे विचित्र वाटत नाही.

  • तुम्ही एकत्र पिकनिकला गेलेला असता त्यामुळे नंतर एकत्र एकमेकांसोबत पिकनिकला अथवा बाहेर जाणे अगदी सोपे जाते.तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी माहित असल्याने कुठे जायचे यावरुन तुमचे वाद होत नाहीत अथवा त्यासाठी तुम्हाला तडजोड देखील करावी लागत नाही.

  • तुमचा बेस्ट फ्रेन्ड तुमच्यासाठी कन्फर्ट झोन असतो त्यामुळे त्यासोबत तुम्हाला आयुष्य आरामात घालवता येऊ शकते.तुम्हाला त्याच्यासोबत जपून बोलावे लागत नाही त्यामुळे तुम्ही मनमोकळे पणाने त्याच्याशी काहीही बोलू शकता.

  • तुम्ही तुमचे चांगले अथवा वाईट सेक्स अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले असतील तर आता त्यांच्यासोबत इंटीमेट होताना तुम्हाला विनोदी वाटू शकते.अशा वेळी याबाबत तुमची तुलना न झाल्यामुळे तुम्ही नाराज न होता त्यांच्यासोबत मोकळेपणाने विनोद देखील करु शकता.

  • अशा रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असुरक्षित अथवा मत्सर वाटत नाही.कारण बेस्ट फ्रेन्डला तुम्हाला वेळेवर न येण्याची अथवा फोन न उचलण्याची किंवा सहका-यांसोबत लंचला जाण्याची कारणे द्यावी लागत नाहीत.त्यामुळे बेस्ट फ्रेन्डला पार्टनर अथवा जोडीदार केल्याने तुमच्या अर्ध्ाअधिक अशा समस्या कमी होतात.तसेच लाँग डिस्टंस रिलेशनशिप टिकवण्यासाठी या 5 टीप्स जरुर वाचा.

  • अशा नात्यामध्ये तुम्हाला एकमेकांच्या बद्दल प्रंचड विश्वास, प्रेम, कम्फर्ट, आपुलकी, काळजी आणि आदर असतो.तुम्ही कधीकधी एकमेकांना गृहीत धरु शकता पण तुम्हाला तुमची मैत्री इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक प्रिय असते.त्यामुळे यातून तुमची रिलेशनशिप अधिक मजबूत होऊ शकते.असे असले तरी लग्नाआधी या ७ गोष्टींबाबत जोडीदारासोबत जरुर बोला.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

शिक्षा करण्यासाठी मुलांवर रागावू नका !

$
0
0

पालक सहजपणे मुलांवर रागाने ओरडतात.मुलांना असे रागावून ओरडण्यापुर्वी त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याबाबत पालक साधा विचार देखील करीत नाही.तुम्हाला असे वाटत असते की मुलांना कठोर शिक्षा देण्यापेक्षा अथवा कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर रागावणे ठीकच आहे.मात्र पालकांनी असे वागणे फारच चुकीचे असते.मुलांवर ओरडल्यामुळे त्यांचे जरी शारीरिक नुकसान होत नसले तरी यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो व त्यांच्या मानसिक स्वास्थावर याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो.

यासंदर्भात मुंबईच्या Psychiatrist and Sexologist डॉ.संघनायक मेश्राम यांच्याकडून जाणून घेऊयात मुलांवर पालकांच्या ओरडण्याचे,सतत सल्ले व टोमणे देण्याचे,इतर मुलांसोबत तुलना करण्याचे काय परिणाम होतात.तसेच मुलांना रागवताना या ’5′ चुका टाळा हे देखील जरुर वाचा.

जाणून घ्या मुलांवर पालकांच्या रागवण्याचे काय परिणाम होतात-

१.नवजात बाळ ते एक वर्षाचे बाळ-

या काळात बाळाला तुमच्याकडून प्रेम,काळजी,आपुलकी व नविन जगासोबत तडजोड करण्यासाठी ध्येर्याची गरज असते.डॉ. मेश्राम यांच्यामते जर तुम्ही बाळंतपणानंतर येणा-या नैराश्याने हैराण होऊन चिडून तुम्ही तुमच्या बाळावर याचा राग काढला तर त्याचे बाळावर वाईट परिणाम होऊ शकतात.खरेतर असे करणे हे फार चुकीचे आहे.कारण तुम्ही तुमच्या बाळाला ओरडून एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तुम्ही एक चिडलेली व्यक्ती आहात असे वाटू लागते.

काय परिणाम होतो-

डॉ.मेश्राम यांच्यामते या काळात बाळाला रागावल्यास त्यांना तो फक्त एक जोरात झालेला आवाज आहे असे वाटते.कदाचित यामुळे मुले चिडचिडी होतात व त्यांच्या झोपेमध्ये व्यत्यय येण्याची समस्या निर्माण होते.अगदी कधीतरी असे झाल्यास याचा मुलांवर याचा फार वाईट परिणाम होणार नाही पण सतत बाळावर असे ओरडणे मात्र नक्कीच योग्य नाही.

काय कराल-

बाळाला शांत करा,त्याला प्रेम करा,त्याच्यासोबत खेळा,त्याच्यासोबत प्रेमाने गप्पा मारा.यामुळे तुमच्या बाळाला सुरक्षित वाटेल व आराम मिळेल.

एक ते तीन वर्षांची मुले-

या वयात मुले फारच संवेदनशील असतात त्यामुळे या वयातील मुलांवर ओरडल्यास त्यांच्या मनावर याचे चुकीचे ठसे उमटतात.डॉ.मेश्राम यांच्यामते मुलांवर ओरडून शिस्त लावण्यापेक्षा त्यांना सुरक्षित वाटेल असे  वागले पाहिजे.ओल्या लादीवरुन फिरताना अथवा  टॉयलेट ट्रेनींग देताना किंवा अगदी जेवणावरुन देखील तुम्ही त्यांना जेव्हा ओरडता तेव्हा त्यांना खरेतर ते समजतच नसते.

काय परिणाम होतो-

या संवेदनशील वयात त्यांच्यावर ओरडल्यामुळे मुले अस्वस्थ होतात.सतत ओरडल्यामुळे त्याच्या आत्मविश्वास व मोकळेपणावर विपरित परिणाम होतो.अशा मुळे ते त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्यासमोर व्यक्त करत नाहीत.

काय कराल-

ओरडण्यापेक्षा तुमच्या मुलांसोबत प्रेमाने संवाद साधा.डॉ.मेश्राम यांच्यामते अशा परिस्थितीत मुलांना तुमच्या आधाराची अधिक गरज असते.त्यामुळे मुलांसोबत शांतपणे संवाद साधा तुम्हाला का ओरडावे लागले व त्याच्या या कृतीमुळे काय त्याचे नुकसान झाले हे त्याला समजावून सांगा.हे जरुर वाचा मुलांच्या हट्टीपणाला कमी करण्याचे ’7′ मार्ग !

तीन ते पाच वर्षाची मुले-

डॉक्टरांच्या मते हे मुलांचे एक अवघड वय असते.त्यामुळे या वयात तुमचे मुल त्याच्या आजूबाजूच्या लोकांसोबत कसे वागते याकडे नीट लक्ष द्या.कारण तुम्ही जर या वयात त्याच्या सोबत जे वागता त्याची तुलना तो त्याचे आजी आजोबा अथवा घरातील इतर माणसे यांच्यासोबत करत असतो.तसेच हेही लक्षात ठेवा की या वयात मुले मोठ्यांकडून त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा करत असतात.तसेच या ’10′ मार्गांनी कमी करा मुलांचा ‘द्वाड’पणा !

काय परिणाम होतो-

खूप ओरडल्यामुळे अथवा रागवल्यामुळे मुलांचे व पालकांचे नाते बिघडू शकते.डॉ.मेश्राम यांच्यामते जर सतत तुम्ही मुलांवर ओरडत असाल तर यामुळे तुमचे मुल विक्षिप्त होऊ शकते.ज्या मुलांना कठोर शब्द ऐकावे लागतात ती मुले पुढे विचित्र वागू शकतात.कदाचित ती तुम्ही त्यांच्यावर ओरडाल म्हणून तुमच्या सोबत खोटे बोलू शकतात,तसेच त्यांचा तुमच्यावरचा विश्वास देखील कमी होऊ शकतो.

काय कराल-

काही कारणात्सव मुलांवर ओरडल्यानंतर त्यांच्यासोबत प्रेमाने बोला.एक मोठा श्वास घ्या व तुमच्या मुलांना समजून सांगा की त्यांच्यावर तुम्हाला का ओरडावे लागले.त्यांनी पाण्याचा ग्लास तोडला असेल अथवा दूध सांडले असेल म्हणून जर तुम्ही त्यांना ओरडला असाल तर  साफसफाई करण्यासाठी त्यांची मदत घ्या.ती चुक दुरुस्त करण्याच्या क्रियेत मुलांना सामिल करुन घ्या,ज्यामुळे मुलांना चुक कशी दुरुस्त करायची हे शिकता येईल.तसेच मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल ?हे देखील जरुर वाचा.

ओरडणे का गरजेचे असते-

कोणतीही गोष्ट अति करणे हे नेहमीच चुकीचे असते.त्यामुळे अति रागावणे देखील अयोग्यच आहे.पण डॉ.मेश्राम यांच्यामते जर तुम्ही तुमच्या मुलांना कधीही रागावलाच नाहीत तर त्यामुळे देखील त्यांचे नुकसान होऊ शकते.कारण अति लाड झालेली मुले पुढे तुमचे नेहमी ऐकतीलच असे नाही.जर तुम्ही मुलांना लहानपणापासून रागावला नाहीत व  ८ ते १० वयात त्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली तर अशी त्या काळात मुले बंडखोर होऊ शकतात.अशी मुले यामुळे सिगारेट ओढणे,डोके भिंतीवर आपटणे,चिडचिड व एकलकोंडेपणा शिकू शकतात.यासाठी डॉ.मेश्राम यांच्यामते मुलांना सावधपणे व समजूतदारपण शिस्त लावा.मुलांवर ओरडल्यावर त्यांवा जवळ घेण्यास व त्यांना प्रेमाने समजावून सांगण्यास विसरु नका.

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

Viewing all 1563 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>