महाराष्ट्रभरात उन्हाच्या झळा वाढ्त्या आहेत. वातावरणात उष्णता वाढल्याने अनेकांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. मग काही औषधं आणि गोळ्या खाण्याऐवजी हे 5 घरगुती उपाय नक्की करून पहा. पण हे उपाय खरचं परिणामकारक आहेत का ? असा प्रश्न तुमच्या मनात रेंगाळतोय? तर काळजी करू नका. हे उपाय आहार व पोषणतज्ञ डॉ. दीपशिखा अग्रवाल यांनी सुचवले आहेत.
- गुळ : गुळाचा छोटासा तुकडा चघळत रहा. हळूहळू तो तोंडात विरघळेल. गुळाचा परिणाम पाच मिनिटांत सुरू होईल.
- थंड दुध : पिताचा त्रास होत असल्यास ग्लासभर थंड दुध प्यावे. थंड दुध प्यायल्याने 15 मिनिटांत जळजळ कमी होण्यास मदत होते.
- ओव्याचे पाणी : ग्लासभर गरम पाण्यात अर्धा चमचा ओव्याची पूड व चिमूटभर मीठ टाकून ते पाणी प्यावे. यामुळे छातीतील जळजळ 8 मिनिटांत कमी होण्यास मदत होते.
- दही: जेवल्यानंतर तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवतो का? मग त्यापासून आराम मिळवण्यासाठी वाटीभर दही खावे. मात्र त्यात साखर किंवा मीठ टाकणे टाळावे.
- शहाळ्याचे पाणी : पित्ताचा त्रास कमी करण्याचा एक हमखास उपाय म्हणजे शहाळ्याचे पाणी. थंडगार पाणी प्यायल्याने पचनाचा मार्ग सुधारतो.
तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास रोज सकाळी 3-4 तुळशीची पानं, पाण्यासोबत गिळावी. ( चावू/चघळू नये)
संबंधित दुवे -
डी-हायड्रेशन पासून बचावण्यासाठी खास ’9′ टीप्स !
Translated By - Dipali Nevarekar