Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जेवणानंतर आंंघोळ करणं पचनाचा त्रास वाढवतात का ?

$
0
0

Read This in English 

 Translated By  -  Dipali Nevarekar
 छायाचित्र सौजन्य : Shutterstock

रविवारी उशिरा उठणं झालं की दुपारच्या जेवणानंतर आंघोळ करण्याची किंवा रात्रीच्या जेवणानंतर आंघोळ करण्याची सवय असते. मात्र असे केल्यास पचनाचा त्रास होईल किंवा पोटदुखी होईल या भीतीने अनेकदा जेवल्यावर आंघोळ न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या सल्ल्यामागे खरंच काही वैज्ञानिक कारण आहे की केवळ गैरसमज हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा हा एक्सपर्ट सल्ला

पि.डी हिंदुजा हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोइंटारोलॉजिस्ट फिलीप अब्राहम यांच्या सल्ल्यानुसार जाणून घ्या खरंच जेवल्यानंतर आंघोळ करणं ही सवय त्रासदायक ठरते का ?

पचनाच्या कार्याला रक्तप्रवाहाची गरज असते. जेवणानंतर आंघोळ केल्याने रक्तप्रवाहाऐवजी शरिराचे तापमान नियंत्रित ठेवण्याकडे अधिक भर दिला जातो. यामुळे हलकेसे  पचन कार्य मंदावते. मात्र  यामुळे थेट पचनकार्यावर परिणाम किंवा पोटदुखीचा त्रास वाढण्याचा त्रास होत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर आंघोळ केल्याने त्रास होतोच यामध्ये फारसे तथ्य नाही.

जेवणानंतर शॉवर, आंघोळ किंवा बाथटबमधील आंघोळ हे आंघोळीचे सुरक्षित पर्याय आहेत. यामुळे पचनाचा त्रास होत नाही. मात्र तुम्हांला आधीपासूनच पचनाचा त्रास होत असल्यास थंड पाण्याने आंघोळ करा.

मात्र जेवणानंतर स्विमिंग सारखा कष्टाचा व्यायाम टाळा. त्यामध्ये शरीराची उर्जा अधिक प्रमाणात लागते. शरीराच्या अनेक भागांवर ताण येतो. परिणामी पचन बिघडते, पचनाच्या काही समस्या वाढतात.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>