Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

जेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का ?

$
0
0

Read this in English

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य –Getty Images

स्टार्टर्स त्यानंतर मेन कोर्स त्यापाठोपाठ गोडाचे पदार्थ असा अनेकांचा खाण्याचा क्रम असतो. जेवण झाल्यावर गोडाचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. विशेषतः सतत गोड खाण्याची इच्छा असणार्‍यांनी हा क्रम पाळणे कितपत फायदेशीर आहे  या बाबत प्रसिद्ध आहारतज्ञ आणि ओबेसिटी कन्सलटंट नैनी सेतलवड यांनी दिलेला हा खास सल्ला  नक्की जाणून घ्या.

गोडाचा पदार्थ जेवणानंतर खाण्यासाठी राखून ठेवणे ही सवय चूकीची आहे. असे आहारतज्ञ नैनी यांचे मत आहे. त्यांच्यामते, जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण निश्चितच वाढते. सोबतच लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणार्‍या इतर शारिरीक समस्यादेखील वाढतात. आहारात डाळी, कडधान्यांचा समावेश असल्यास त्यातून मुबलक प्रमाणात प्रोटीन शरीरात जाते. यामध्ये साखरही असते. त्यामुळे शरीराची नियमित साखरेची गरज त्यामधूनच पूर्ण होण्यासाठी मदत होते. मात्र जेवणानंतर गोडाचे पदार्थ राखून ठेवून खाल्ल्याने सहाजिकच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अचानक साखर वाढल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती मंदावते. यामुळे मधूमेह, लठ्ठपणा,किडनीचे विकार, हृद्यविकार अशा आजारांचा धोका वाढतो. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

  • गोडाचे पदार्थ कधी खावेत ?

जेवणानंतर  गोडाचे पदार्थ खाण्याऐवजी ते नैसर्गिक स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर ठरतात. जसे की, उन्हाळ्यात फळं किंवा हिवाळ्यात सुकामेवा खाणं अधिक फायदेशीर ठरते. एखादा गोडाचा पदार्थ जेवणा दरम्यान खाणं हा उत्तम पर्याय आहे. यामुळे तात्काळ उर्जा मिळते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याचा धोकादेखील कमी होतो. जेवल्यानंतर गोड खाल्ल्याने अचानक रक्तातील साखर वाढण्याचा धोकादेखील यामध्ये कमी असतो. म्हणूनच तुम्हांला सतत गोड खाण्याची इच्छा होत असल्यास त्यावर या ’7′ मार्गाने मात करा.

तुमचा आहार साखर, फॅट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फळं, भाज्या यांनी संतुलित असेल तर जेवणानंअत्र गोड खाणे टाळा असा सल्ला नैनी देतात. मात्र तुम्हांला जेवणानंतर गोड खाण्याची सवय असल्यास हळूहळू ती कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी गोडाच्या पदार्थांऐवजी फळं खाण्याची सवय लावा. सुरवातीचे काही दिवस गोड खाण्याच्या इच्छेवर काबू मिळवणे सहाजिकच थोडे कठीण जाईल. मात्र हळूहळू तुमच्या सोबतच शरीरालादेखील ही गोष्ट सवयीची होईल. जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी अळशी, तीळ, बडीशेप,बदामाचे काप यांचे एकत्र मिश्रण बनवून खावे.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>